-
जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला की तुम्ही तुमच्या९ ते ५ कामानंतर घरी काय करता? तुम्ही ९ ते ५ च्या काम करून थकला आहात का? काही लोक कामाचा आनंद घेतात तर काहींना ते कंटाळवाणे वाटते.
-
तज्ज्ञाने स्पष्ट केले की, कामानंतर विश्रांतीमुळे स्वत: ची काळजी आणि तणाव कमी करण्याच्या संधी मिळतात, जे कामातून तणाव आणि बर्नआउटशी सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
-
कामानंतर स्वत:ला थोडा वेळ दिल्याने व्यक्तीला आराम वाटतो आणि कामात उत्पादकताही वाढते. कार्य-जीवन संतुलनाचे अनेक फायदे आपण गृहीत धरू शकतो, परंतु जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनात काही बदल करत नाही तोपर्यंत हे शक्य नाही.
-
कामाच्या मागणी, मर्यादा, अस्पष्टता आणि कामामुळे वाढलेला स्क्रीन वेळ यासारखे अनेक घटक हे संतुलन बिघडू शकतात. Apxart यांनी ते कसे टाळावे याच्या टिप्स येथे दिल्या आहेत,
-
१) तुमचे वेळापत्रक संतुलित करा
एक शेड्यूल तयार करा ज्यामध्ये कामासाठी वेळ, वैयक्तिकअॅक्टिव्हिटी आणि विश्रांती समाविष्ट आहे. संतुलन सुनिश्चित करण्यासाठी कार्यांना प्राधान्य द्या. -
२) मर्यादा निश्चित करा
काम आणि वैयक्तिक जीवन यामध्ये स्वच्छ मर्यादा सेट करा. कामाशी संबंधित ताणतणाव घरी आणणे टाळा किंवा घरी आल्यावर तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. -
3) स्वत:ची काळजी घेण्यास प्राधान्य द्या
तणाव कमी करण्यासाठी आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी व्यायाम, ध्यान आणि विश्रांती तंत्र यासारख्या क्रियाकलाप आवश्यक आहेत. -
4) प्रियजनांसोबत वेळ घालवा
कुटुंब आणि मित्रांसह दर्जेदार वेळ घालवा. त्यामुळे भावनिक आरोग्यासाठी निरोगी नातेसंबंध राखणे महत्त्वाचे आहे. -
५) तुमच्या छंदांसाठी वेळ काढा
आनंद देणारे छंद आणि आवडींमध्ये व्यस्त रहा. या गोष्टी सकारात्मक भावना देतात आणि तणावाच्या काळात आराम देतात. -
६) गरज असल्या तज्ज्ञांशी बोला कामाशी संबंधित ताण जास्त असल्यास, थेरपिस्ट किंवा समुपदेशकाकडून मदत घेण्याचा विचार करा. मानसिक आरोग्य संतुलन साधण्यासाठी तज्ज्ञांचे समर्थन आवश्यक आहे.

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”