-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा १२ प्रभाव राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ऑगस्टमध्ये सूर्य स्वराशी असलेल्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचा सिंह राशीतील प्रवेश नेहमीच शुभ मानला जातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
येत्या १६ ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार असून सूर्याच्या या राशी परिवर्तनामुळे काही राशीच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सिंह राशीच्या व्यक्तींनाही सूर्याचे राशी परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सूर्याचा सिंह राशीतील प्रवेश कन्या राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत सुखदायी असेल. हा काळ कन्या राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशी परिवर्तन खूप लाभदायी ठरेल. या काळात भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. धार्मिक कार्यात मन रमेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम