-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या प्रभावी कामगिरीचे कौतुक केले होते. (Source: PTI)
-
त्यानंतर आज १६ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांनी त्यांच्या निवासस्थानी खेळाडूंची भेट घेतली आणि एकत्र नाश्ता केला. (Source: MYAS/Twitter)
-
भारतीय खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये एका सुवर्णासह सात पदके जिंकली. ही भारताची आतापर्यंतची ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. (Source: MYAS/Twitter)
-
नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले, जे भारताचे अॅथलेटिक्समधील पहिले पदक ठरले. (Source: MYAS/Twitter)
नाश्त्यादरम्यान मोदींनी चोप्रा आणि पी. व्ही. सिंधू यांच्याशी संवाद साधला. दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पी. व्ही. सिंधू दुसरी भारतीय आणि पहिली महिला खेळाडू आहे. पी. व्ही. सिंधूने रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये जिंकलेले रौप्यपदकही तिच्यासोबत आणले. (Source: MYAS/Twitter) -
पंतप्रधानांनी ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये भारताला हॉकी पदक मिळवून देणाऱ्या पुरुष हॉकी संघाशीही संवाद साधला. सर्व खेळाडूंनी स्वाक्षरी केलेले हॉकी स्टिक्स संघाने पंतप्रधानांना सादर केले. (Source: MYAS/Twitter)
-
पंतप्रधानांनी कर्णधार मनप्रीत सिंग यांच्याशीही चर्चा केली. (Source: MYAS/Twitter)
-
मोदींनी ऑलिम्पिकमधून दोन पदके घेऊन परतलेल्या कुस्ती संघाशीही संवाद साधला. (Source: Bajrang Punia/Twitter)
-
मीराबाई चानूने पहिल्याच दिवशी रौप्यपदक जिंकून भारताच्या मोहिमेची सुरुवात केली. (Source: SAI/Twitter)
-
बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनने कांस्यपदक जिंकले. (Source: PTI)
-
भारतीय महिला हॉकी संघाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करून प्रथमच ऑलिम्पिक उपांत्य फेरीत प्रवेश केला. (Source: PTI)
-
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रामध्ये भारतीय ऑलिम्पिक पथकाला निमंत्रित केलं होतं. (Source: President of India/Twitter)
-
नुकत्याच पार पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकासह सात पदके जिंकली आहेत. (Source: AP)
-
स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १४ ऑगस्ट च्या संध्याकाळी राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात चहापानाच्या कार्यक्रमासाठी टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना निमंत्रण दिलं होतं. (Source: President of India/Twitter)
यावेळी, टोक्यो ऑलिम्पिकमधील पदक विजेते उपस्थित होते. यावेळी 'संपूर्ण देशाला आमच्या खेळाडूंचा अभिमान आहे की त्यांनी देशाचा गौरव केला आहे' असे राष्ट्रपतींनी म्हटलं. (Source: President of India/Twitter) -
या भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकमधील भारताच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटलं. (Source: PTI)
-
"बहुतेक खेळाडू त्यांच्या क्रीडा कारकिर्दीच्या सुरुवातीला आहेत. टोक्योमध्ये सर्व खेळाडूंनी ज्या भावनेने आणि कौशल्याने कामगिरी बजावली ती क्रीडा विश्वात भारताचे स्थान आणखी प्रभावी करेल," असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं. (Source: PTI)
-
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीच्या बळावर भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी जागतिक हॉकी क्रमवारीत प्रत्येकी एक स्थानाने आगेकूच केली आहे. (Source: SAI/Twitter)
-
पुरुष संघाने ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवताना कांस्यपदक जिंकले, तर महिला संघाने चौथा क्रमांक मिळवला. (Source: SAI/Twitter)
-
भारताच्या खेळाडूंनी टोक्योत इतिहास रचला आणि आजपर्यंत सर्वाधिक पदके जिंकली. (Source: Manpreet/Twitter)

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा