डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने महापालिकेच्या सहकार्याने शहरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. शहरातील २७ स्मशानभूमी, १३ दफनभूमीचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यामध्ये २११ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.
शहर आणि ग्रामीण भागातील भैरवनातनगर, किरकिटवाडी, मुक्तीधाम, नांदेड गाव, शिवणे स्मशानभूमी, ठोसरपागा, धायरी, वडगाव बुद्रुक, नऱ्हेगावं, वारजे, कर्वेनगर, कोथरूड, बावधन, वैकुंठ स्मशानभूमी, खडकवासला, पिरंगुट, मुक्ताईनगर, हडपसर-रामटेकडी परिसरातील दफनभूमी, औंध स्पायसर, येरवडा, विश्रांतवाडी, धानोरीगांव, लोहगांव, वडगांवशेरी, वाघोली, येरवडा, मुंढवा, बिबवेवाडी, गुलटेकडी, बिबवेवाडी, कोंढवा, कात्रज, धनकवडी या भागातील एकूण ३७ स्मशानभूमी आणि तेरा दफनभूमींचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
एकूण ५ लाख १ हजार १३३ चौरस मीटर परिसराची स्वच्छता या मोहिमेअंतर्गत करण्यात आली. यामध्ये ४ हजार ९६ स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. एकूण २११ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आल्याची माहिती डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली. संपूर्ण समाज हे मोठे कुंटुब आहे आणि या कुटुंबाचे सर्वजण सदस्य आहेत, या भावनेतून स्वच्छता राखण्याचे काम करण्यात यावे, असा संदेशही यानिमित्ताने देण्यात आला.