भारतानं अमेरिकेला ठणकावलं, धार्मिक बाबतीत आरोप करणारा USCIRF चा अहवाल नाकारला!
अमेरिकेच्या USCIRF संस्थेच्या अहवालात भारतातील धार्मिक अल्पसंख्यकांविरोधातील हिंसाचार वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैसवाल यांनी या अहवालाला भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न म्हटलं आहे. त्यांनी USCIRF ला 'विशिष्ट काळजीची संस्था' म्हणून वर्ग करण्याची मागणी केली आहे. जैसवाल यांनी भारताच्या वैविध्यपूर्ण सामाजिक संरचनेचं योग्य आकलन नसल्याचंही नमूद केलं आहे.