परदेशात ठेवण्यात आलेला काळा पैसा आम्ही सत्तेवर आणल्यावर भारतात आणू आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू, असे आश्वासन देणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांच्या खात्यात केवळ एक रुपया जमा केला असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी मंगळवारी केली.










