राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री तेलंगणात जाऊन प्रचार करत आहेत. त्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्र डागलं आहे. राज्यात सरकार आहे की नाही असा प्रश्न पडला असल्याचं ते म्हणाले. आज त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत सरकारच्या कारभारावर टीका केली.














