Vijay Wadettiwar: काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला, ज्यामध्ये २६ जण ठार झाले आहेत. या घटनेबाबत बोलताना आमदार विजय वडेट्टीवार यांनी एक वक्तव्य केले. “दहशतवादी हल्ला करतेवेळी लोकांशी बोलत बसतात का? धर्म विचारत बसतात का?” असे ते म्हणाले. या वक्तव्यावरुन विजय वडेट्टीवार यांच्यावर अनेकांनी टीका केली. आता विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.