Devendra Fadnavis: ‘मी दुसऱ्यांदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, असा उल्लेख करण्यात आला. मात्र मी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालो आहे, ही गोष्ट तुम्ही विसरले. मात्र मी पहाटेचा शपथविधी आणि माझे ७२ तासांचे मुख्यमंत्रीपद कधीच विसरू शकत नाही, याची तुम्हाला आठवण करून देतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात म्हणाले.नरिमन पॉइंट येथील ‘एनसीपीए’ येथे पार पडलेल्या ‘लोकमाता अहिल्याबाई होळकर – एन इटरनल फ्लेम’ या कॉफी टेबल पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.