देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आता काय खबरदारी घेतली जात आहे याविषयी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसंच आरोग्य विभाग सर्वच आजाराच्या बाबतीत सतर्क आहे. कोणत्याही आजाराबाबत लक्षणं वाढत असल्यास आरोग्य विभागाचं लक्ष आहे. महिनाभरात देशभरात रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र आताच्या घडीला कोरोनाची लक्षणं सौम्य दिसत आहेत. तरी देखील नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे, असं प्रकाश आबिटकर म्हणाले.