RCB Victory Parade Stampede in Bangalore : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने तब्बल १८ वर्षांनी आयपीएलचा चषक उचलला आहे. यानिमित्त बंगळुरूत आरसीबीच्या संघाची विजयी परेड आयोजित करण्यात आली होती. या विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू झाला आहे. आरसीबीचं होम ग्राऊंड असलेल्या चिन्नास्वामी स्टेडियमवर संघाचा विजयी जल्लोष अनुभवण्यासाठी चाहत्यांनी तुफन गर्दी केली होती. त्याचवेळी चेंगराचेंगरी होऊन ११ जण दगावले, तर ४७ जण जखमी झाले आहेत. बुधवारी संध्याकाळी चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या विजयाचं सेलिब्रेशन चालू होतं. तर, स्टेडियमबाहेर शोकाकूल व भीतीचं वातावरण होतं. या सगळ्या प्रकरणावर आता विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.