scorecardresearch

उद्धव ठाकरे News

उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे ते अध्यक्ष होते. मात्र २०२२ साली पक्षात फूट पडल्यानंतर त्यांना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह गमवावे लागले. उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबईत झाला आणि दादरमधील बालमोहन विद्यामंदिरमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. जेजे स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर उद्धव ठाकरे यांनी रश्मी पाटणकर यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे मोठे चिरंजीव आदित्य ठाकरे हेदेखील शिवसेनेचे नेते आहेत. २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले होते. उद्धव ठाकरे हे छायाचित्रकारही आहेत. त्यांची ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पहावा विठ्ठल’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.


२००२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे (Shivsena) प्रचार प्रभारी बनल्यानंतर ठाकरे यांनी राजकारणात पदार्पण केले. २००३ मध्ये त्यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि २००६ मध्ये ते पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाचे मुख्य संपादक झाले. २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि २०१३ मध्ये ते अध्यक्षपदी विराजमान झाले. कोणत्याही सरकारमध्ये स्थान मिळवणारे ठाकरे कुटुंबातील ते पहिले सदस्य ठरले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारून स्वतःबरोबर पक्षाचे ४० हून अधिक आमदार आणि १३ खासदारांसह शिवसेना पक्ष ताब्यात घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर आणि न्यायालयात संघर्ष करत कडवी झुंज दिली. पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतरही २०२४ च्या निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाने नऊ जागांवर विजय मिळविला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या.


Read More
Eknath shinde
विश्लेषण : ठाकरे विरुद्ध शिंदे… मुंबई महानगरपालिकेत सत्ता कोणाची? प्रीमियम स्टोरी

महानगरपालिकेची निवडणूक या दोन पक्षांसाठी कसोटीची असेलच, पण या निवडणुकीच्या निकालावरच या दोन पक्षांची पुढची वाटचाल अवलंबून असेल हेदेखील तितकेच…

Raju Patil and Dipesh Mhatre protest for the Palava bridge Both Thackeray party united for the delayed bridge
रखडलेल्या पुलासाठी दोन्ही ठाकरे एकत्र; पलावा पुलाच्या आंदोलनासाठी राजू पाटील, दीपेश म्हात्रे यांचे आंदोलन

ठाकरे पक्ष, मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी पलावा पूल सुरू करण्याच्या मागणीसाठी शेकडोच्या संख्येने जमा झाले होते.

UBT Shivsena Leader Bala Darade Warns Rahul Gandhi
Rahul Gandhi : “वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासणार आणि..”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेना नेत्याचा इशारा

काँग्रेस असल्या सोम्यागोम्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही असं महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

स्वा. सावकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत वाद; ठाकरे गटाच्या नेत्याने काय इशारा दिला? (फोटो सौजन्य @पीटीआय)
Maharashtra Politics : स्वा. सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस-ठाकरे गटाचे नेते आमनेसामने, महाविकास आघाडीत काय घडतंय?

Shivsena vs Congress : नाशिकमध्ये येण्याआधी राहुल गांधींनी महाराष्ट्रातील जनतेची, हिंदुत्ववाद्यांची माफी मागावी. जर ते माफी न मागता नाशिकमध्ये आले…

Harshal Pradhan views on Eknath Shinde article on maharashtra housing policy
एकनाथ भाई, तुमची आश्वासने पूर्ण होतील?

‘सर्वसामान्यांच्या घरांची स्वप्नपूर्ती’ या ‘पहिली बाजू’ (२७ मे) या सदरात प्रसिद्ध झालेल्या उपमुख्यंमत्री तसेच गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लेखाला प्रत्युत्तर

ashish Shelar alleged Uddhav Thackeray group has been dishonest with Mumbaikars on Wednesday
मुंबई तुंबण्यावरून आशिष शेलार यांची ठाकरे गटावर टीका, वीस वर्षातील कामांची श्वेतपत्रिका काढण्याची पालिका आयुक्तांकडे मागणी

उद्धव ठाकरे गटाने मुंबईकरांशी बेईमानी केली आहे, असा आरोप मुंबई उपनगर पालकमंत्री आणि मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड आशिष शेलार यांनी…

Narayan Rane on uddhav and raj Thackerya Alliance
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून नारायण राणेंचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “युती करताना…” फ्रीमियम स्टोरी

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा जोरात सुरू आहे. या चर्चेवर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Uddhav Thackeray on metro Corruption
मेट्रो मार्गात पाणी गेल्याने भ्रष्टाचार बाहेर! उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांची टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या अवस्थेवरून सरकारला धारेवर धरले आहे. काँग्रेसकडूनही सरकारला लक्ष्य करण्यात आले आहे.

NCP MLA jitendra awhad criticised state government mahayuti government
मुंबई तुंबल्यावर उद्धव ठाकरेंना जाब विचारायचे मग, आता सरकारने उत्तर द्यावे – आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

गेल्या तीन वर्षांपासून मुंबई शहर हे राज्य सरकारच्या हातात आहे. त्यामुळे मुंबई तुंबली का, याचे उत्तर राज्य सरकारने द्यावे -…

Raj Thackeray and Uddhav thackeray
“राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत”, ठाकरे कुटुंबियांबरोबर दीर्घ काळ राहिलेल्या नेत्याचं मोठं विधान!

राज ठाकरेंना तुम्ही जवळून पाहिलंय, ते उद्धव ठाकरेंबरोबर जातील का?असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं आहे.

ताज्या बातम्या