पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जनतेला उद्देशून केलेले भाषण प्रभावहीन असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली. पंतप्रधानांच्या भाषणात नवीन कल्पना, योजना आणि उपक्रमांचा अभाव असल्याचे काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनी भाषण करत असल्याने, जनतेच्या त्यांच्याकडून खुप अपेक्षा होत्या. त्यामुळे आगामी पाच वर्षांसाठी सरकारची धोरणे, रणनिती यांसारख्या मुद्द्यांवर भाषणातून प्रकाश टाकला जाणे अपेक्षित होते. मात्र, नरेंद्र मोदींच्या भाषणातील मुद्दे खूपच सामान्य असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी केली. काँग्रेस सरचिटणीस शकील अहमद यांनीही नरेंद्र मोदींचे भाषण प्रभावहीन असल्याची टीका केली. या भाषणात नवीन गोष्टींचा आणि कल्पनांचा अंतर्भाव नसल्याचे त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Aug 2014 रोजी प्रकाशित
स्वातंत्र्यदिनी नरेंद्र मोदींनी केलेले भाषण प्रभावहीन – काँग्रेस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जनतेला उद्देशून केलेले भाषण प्रभावशुन्य असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली. पंतप्रधानांच्या भाषणात नवीन कल्पना, योजना आणि उपक्रमांचा अभाव असल्याचे काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 15-08-2014 at 04:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress attacks pms i day address calls it zero effect speech