विकास, विश्वास आणि विनयशीलतेच्या त्रिसूत्रीचा आधार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दयानंद लिपारे, कोल्हापूर</strong>

विकास, विश्वास आणि विनयशीलता या त्रिसूत्रीच्या आधारे शिरोळ तालुक्यातील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे विद्यमान अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी एकहाती आणि एकतर्फी विजय मिळवला.

दत्तमधील सहवीज निर्मितीचा सहवीज प्रकल्प, गैरव्यवहार, अकार्यक्षमता असे अनेकानेक मुद्दावरून सत्ताधारी आघाडीला घेरण्याचा प्रयत्न विरोधी आघाडीने केला. परंतु ‘दत्त’ची एकूण कामकाज पद्धती आणि नव्या प्रकल्पांबाबत ऊस उत्पादकांनात खात्री पटल्याने त्यांनी आपले योगदान गणपतराव पाटील यांना दिलेल्या भरघोस मताधिक्यातून दिसून आले आहे. साखर कारखानदारीत अनोखे प्रकल्प शेतकऱ्यांच्या बांधावर सुरु करण्याचे आव्हान पुढील काळात पाटील यांना पेलावे लागणार आहे.

राज्यातही साखर कारखानदारी अडचणीत आल्याचा पाढा गेली काही वर्षे सातत्याने वाचला जात आहे. या अडचणी दत्तच्या सभोवती आहेतच, तरीही त्यावर मात करून साखर कारखानदारीत वेगळा ठसा उमटण्याची किमया या कारखान्यात झाली आहे. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील कार्यक्षमता,ऊ स व्यवस्थापन, तांत्रिक बाबी अशा विविध प्रकारचे ५० पेक्षा अधिक पुरस्कार मिळवून दत्तने आपला दर्जा सिद्ध केला आहे.

असे असले तरी दत्तच्या कामकाज पद्धती, राबवलेले प्रकल्प, त्याचे आर्थिक यशापयश यावरून विरोधकांनी कारखान्याच्या संचालकांना अनेकदा धारेवर धरले आहे. दत्तचे संस्थापक संचालक डॉ. सा. रे. उर्फ अप्पासाहेब पाटील यांनी ३५ वर्षे एकहाती सत्ता कायम राखली. उपक्रमशीलतेला प्राधान्य देणारम्य़ा अप्पासाहेबांना कागद प्रकल्पापासून ते कामकाज पद्धतीवरून अनेकदा कोंडीत पकडले. दिवंगत खासदार बाळासाहेब माने, प्रकाश खंजिरे अशा दिग्गजांनी आव्हान दिले असतानाही त्यांनी ते परतवून लावत सत्ता कायम राखली. राजू शेट्टी यांचे नेतृत्व तर दत्त साखर कारखान्याशी झालेल्या संघर्षांतूनच फु लले. अपवाद होता तो केवळ गतवेळी बिनविरोध झालेल्या निवडणुकीचा.

कारखान्यात यशस्वी, राजकारणात प्रतीक्षा

माजी आमदार सा. रे. पाटील यांच्या निधनानंतर दत्तची ही पहिलीच निवडणूक  झाली. दत्तचे संस्थापक संचालक दिनकरराव यादव यांचे नातू पृथ्वीराज यादव यांनी आघाडी करून सत्ताधाऱ्यापुढे आव्हान निर्माण केले. दत्तच्या सहवीज प्रकल्प, कारखान्यावरील कर्जाचा बोजा, अकार्यक्षम कारभार याचे वाभाडे त्यांनी प्रचार सभांतून केले. मात्र, विरोधी आघाडीत यादव वगळता प्रभावी उमेदवारांची वानवा होती. खुद्द त्यांचे चुलते, भाजपचे नेते अनिल यादव हेच सत्ताधारम्य़ांच्या आघाडीत यंदाही होते. त्यामुळे अनेकांनी निवडणूक बिनविरोध करावी असे सुचवले होते. दुसरीकडे,  कारखान्याच्या माध्यमातून उत्कृष्ट प्रशासनाची सांगड घालणारे सा. रे. पाटील यांच्या कार्याची शिदोरी घेऊ न गणपतराव निवडणुकीत उतरले होते. उसाची नियमित देयके, नवनवीन प्रयोग करून क्षारपड जमीन सुधारणा, सेंद्रिय ऊ स शेती, एकरी २०० टन ऊ स उत्पादन यासह अनेक प्रभावी योजना कारखान्याच्या माध्यमातून राबविल्या जात असल्याचे  महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांनी पाहिले होते. हीच विकासात्मक दृष्टी गणपतराव पाटील यांच्या यशाची मुहूर्तमेढ होती, सभासदांनी मतदानाच्या माध्यमातून त्यावर शिक्कामोर्तब केला. या यशामुळे आता पाटील यांच्या राजकीय आशेचा मळा फुलताना दिसत असून विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी प्रबळ ठरली आहे. वडिलांच्या पायावर पाय ठेवून सहकारात यशस्वी ठरलेले पाटील राजकारणातही अप्पासाहेबांची गादी चालवणार का, याचे उत्तर मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganpatrao patil panel win shree datta shetkari sahakari sakhar karkhana election zws