Maharashtra Political News Today: नागपूरमध्ये जो पूर आला त्यावरुन सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाने देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे. तसंच चंद्रशेखर बावनकुळेंनी जे पत्रकारांना ढाब्यावर न्या असं जे वक्तव्य केलं आहे त्याचाही समाचार घेतला जातो आहे. तसंच पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला जी नोटीस बजावण्यात आली आहे त्यावरुनही त्यांची नाराजी समोर आली आहे. तसंच सुप्रिया सुळे यांनीही पंकजा मुंडे भाजपाची लेक नाही का? असा सवाल केला आहे. तर अनिल देशमुख यांनी पंकजा मुंडेंनी आता योग्य तो निर्णय घ्यावा असा सल्ला दिला आहे. या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रात घडत आहेत. या सगळ्या घडामोडींवर लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष असणार आहे.
Marathi News Today |पंकजा मुंडेंनी योग्य निर्णय घ्यावा, या नेत्याने दिला सल्ला आणि महत्त्वाच्या घडामोडी
गाडी थांबवून नईम शेखवर धारदार चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्याच्या वेळी नईमचे तिन्ही साथीदार पळून गेले.
जालन्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव खासगी बस पुलाखाली कोसळून झालेल्या अपघातात २० ते २५ प्रवासी जखमी झाले आहेत. यातील दोघे गंभीर जखमी आहेत. ही घटना सोमवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी शिवारात घडली. एक खासगी बस ही पुण्याहून नागपूरच्या दिशेने जात होती. ही बस छत्रपती संभाजीनगर ते जालना मार्गावरील बदनापूर नजीक मात्रेवाडी शिवारात आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाखाली कोसळली. अपघाताची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातील जखमींवर जालना येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
पंकजा मुंडे राष्ट्रसंत भगवानबाबा जयंती उत्सव सोहळ्यात बोलत होत्या.
पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला जी नोटीस बजावण्यात आली आहे त्यावरुनही त्यांची नाराजी समोर आली आहे. तसंच सुप्रिया सुळे यांनीही पंकजा मुंडे भाजपाची लेक नाही का? असा सवाल केला आहे. तर अनिल देशमुख यांनी पंकजा मुंडेंनी आता योग्य तो निर्णय घ्यावा असा सल्ला दिला आहे. या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रात घडत आहेत. या सगळ्या घडामोडींवर लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष असणार आहे.