अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. गुजरातमध्ये जाऊन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अनिल जयसिंघानीला मुंबईत आणण्यात आलं आहे. त्याला मलबार हिल पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडेही सुपूर्द करण्यात आलं आहे. तो ७२ तास चकवा कसा देत होता? त्याला पकडताना काय काय अडचणी आल्या हे सगळं मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिल जयसिंघानी बऱ्याच वर्षांपासून फरार होता

अनिल जयसिंघानी हा बऱ्याच वर्षांपासून फरार होता. मुंबई पोलिसांनी पाच दिवसांचं सर्च ऑपरेशन राबवून त्याला अटक केली आणि मुंबईत आणलं. अनिल जयसिंघानी तांत्रिक बाबींची मदत घेऊन स्वतःचं अस्तित्त्व लपवत होता. मात्र मुंबई पोलिसांनी पाच दिवस शोध मोहीम राबवून अनिल जयसिंघानीला अटक केली. मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेची पाच पथकं तयार केली होती. ही पाच पथकं वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनिल जयसिंघानीचा शोध घेत होती. अनिल जयसिंघानीवर महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये एकूण १५ गुन्हे दाखल आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil jaisinghani evaded the mumbai police for 72 hours police told the whole sequence of events scj
First published on: 20-03-2023 at 14:13 IST