-
२३ फेब्रुवारी १९६९ रोजी सांगलीच्या पटवर्धन या मराठी कुटुंबात भाग्यश्रीचा जन्म झाला. (फोटो सौजन्य – भाग्यश्री पटवर्धन/इन्स्टाग्राम)
-
भाग्यश्री राजघराण्याशी संबंधित आहे. तिचे वडील विजय सिंहराव माधवराव पटवर्धन सांगलीचे राजे आहेत.
-
एक-दोन मालिकांमध्ये काम केल्यानंतर भाग्यश्रीला १९८९ साली राजश्री प्रोडक्शनच्या 'मेने प्यार किया' चित्रपटात सलमान खान बरोबर मोठा ब्रेक मिळाला.
-
'मेने प्यार किया' हा करीयरमधील भाग्यश्रीचा सर्वात यशस्वी चित्रपट आहे. 'मेने प्यार किया'साठी भाग्यश्रीला बेस्ट फिमेल डेब्युचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
-
कैद मे है बुलबुल, त्यागी आणि पायल या तीन चित्रपटात भाग्यश्रीने काम केले.
-
बॉलिवूड शिवाय भाग्यश्रीने तामिळ, तेलगु, कन्नड, मराठी आणि भोजपुरी सिनेमांमध्ये काम केले आहे.
-
भाग्यश्रीला अभिमन्यू आणि अवंतिका अशी दोन मुले आहेत. भाग्यश्रीच्या मुलाने अभिमन्यूने 'मर्द को दर्द नही होता' या कॉमेडी सिनेमातून डेब्यू केला आहे.
-
भाग्यश्री हे नाव आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे ते 'मेने प्यार किया' चित्रपटासाठी. हा चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला होता.
-
२००१ साली हॅलो गर्ल्समधून भाग्यश्रीने बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. जननी, हमको दिवाना कर गये या चित्रपटांमध्ये भाग्यश्रीने काम केले आहे.
-
भाग्यश्री आजही फिटनेसला तितकच महत्व देते. एकही दिवस न चुकवता नित्यनियमाने तिचा व्यायाम सुरु असतो. हेच भाग्यश्रीच्या फिटनेसचे रहस्य आहे.
-
पडद्यावरच नाही, तर पडद्यामागेही सलमान खान चांगला माणूस असल्याचे भाग्यश्रीने सांगितले. त्यासाठी तिने एक उदाहरण दिले.
-
त्यावेळी एक लोकप्रिय फोटोग्राफर होते. आता ते हयात नाहीत. त्यांना माझे आणि सलमानचे काही हॉट फोटो काढायचे होते.
-
त्यांनी सलमानला बाजूला घेऊन सांगितले कि, "मी जेव्हा कॅमेरा सेट करीन, तेव्हा तू तिला किस कर" असे भाग्यश्रीने डेक्कन क्रॉनिकलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
-
आम्ही त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये नवोदीत कलाकार होतो. त्यामुळे आपल्याला असे काही करायचे स्वातंत्र्य आहे, असा त्या फोटोग्राफरचा समज होता.
-
त्यावेळी सलमानने त्या फोटोग्राफरचा प्रस्ताव मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला. तुम्हाला अशी काही पोझ हवी असल्यास, तुम्ही भाग्यश्रीला विचारा, असे त्याने सांगितले.
-
त्या फोटोग्राफरला सलमानने दिलेले उत्तर मला खूप आवडलं. सलमानबद्दलचा आदर आणखी वाढला. मी सुरक्षित लोकांमध्ये वावरत असल्याची मला जाणीव झाली, असे भाग्यश्रीने सांगितले.

PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?