-
स्थूल जीवनशैली, जंक फूड, ताणतणाव, वाढती चरबी या साऱ्या गोष्टी हृदयविकारासाठी कारणीभूत ठरतात. जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा जाणून घ्या शरीरात काय बदल होतात.
-
शरीरासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन आणि पोषक तत्व शरीराला पोहोचवण्याचे प्रमुख काम हे हृदयाचे आहे. ज्या धमन्यांमधून हा रक्तपुरवठा सुरू असतो त्या वाढत्या वयाबरोबर कमजोर होऊ लागतात.
-
हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या या हळूहळू आकुंचन पावतात किंवा त्या काम करणे थांबवतात. यामुळे रक्तपुरवठ्याला अडथळा निर्माण होतो. हृदयविकार झटक्याची ही पहिली पायरी आहे.
हे होत असताना जर माणूस अधिक धावपळीचे काम करत असेल तर याचे परिणाम गंभीर होतात. शरीराला कार्य करण्यासाठी अधिक उर्जेची गरज असते. या उर्जेचा पुरवठा करण्यासाठी हृदयाची धडपड सुरू होते. पण याचवेळी रक्तपुरवठा करणा-या धमन्यांमध्ये लाल रक्त कणिका जमायला सुरूवात होते. धमन्यांतील या अडथळ्यांमुळे मग रक्त प्रवाह खंडित व्हायला सुरूवात होते. -
रक्त पुरवठा होण्यासाठी आलेला अडथळा तसेच ऑक्सिजनची कमी यामुळे हृदयावर परिणाम व्हायला सुरूवात हेते. ऑक्सिजन मिळवण्यासाठी हृदयाचे ठोके जलद वाढतात त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो.
नंतर घाम येणे, मळमळणे, अस्वस्थ वाटणे, छातीत दुखणे अशी हृदयविकारच्या झटक्याची लक्षणे दिसायला सुरूवात होते. ऑक्सिजनचा पुरवठा कमी व्हायला लागला की याची माहिती हृदय मेंदूला देतो आणि त्वरित शरिरातल्या इतर अवयवांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन तो हृदयाकडे वळवला जातो याचमुळे हृदयविकाराचा झटका येण्याआधी छातीत कळ उठते. कधीकधी काही मिनिटे छातीत दुखते तर कधी हे दुखणे तासापर्यंत लांबू शकते. जर हृदयविकाराचा झटका आल्यानंतर वेळेवर उपाय योजला नाही तर हळूहळू हृदयाच्या मांसपेशी मरू लागतात आणि हृदय काम करणे बंद करते. यानंतर काहीच मिनिटांत मेंदूच्या कोशिकाही मृत पाऊ लागतात. हृदय विकारानंतर हृदयाचा जो हिस्सा बंद पडतो तो पुन्हा कधीच ठीक होत नाही.

मगरीनं बघता बघता १३ वर्षाच्या मुलाला खाऊन टाकलं; गावकरी बघत राहिले अन्…, रडणाऱ्या मुलाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल