-
ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला खूप महत्त्व आहे. गोचर म्हणजे एक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या संक्रमणला ज्योतिषी भाषेत गोचर असं म्हणतात.
-
आता ६ एप्रिलला शुक्र वृषभ राशीत गोचर करणार आहे. ही शुक्राची स्वरास आहे. ज्यामुळे अत्यंत शुभ असा ‘मालव्य राजयोग’ तयार होत आहे.
-
वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार, शुक्र हा ग्रह भौतिक सुख, वैभव, धन, प्रेम, सौंदर्य यांचा कारक मानला जातो. यामुळेच जेव्हा एखाद्या राशीत शुक्राचे गोचर होते तेव्हा त्याचे नशीब पालटायला सुरुवात होऊ शकते.
-
मालव्य राजयोग हा शुभ योगांपैकी एक योग आहे. या राजयोगामळे काही राशींच्या लोकांचे नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतात. चला तर बघूया कोणत्या आहेत, ‘या’ भाग्यशाली राशी…
-
मालव्य राजयोग बनल्याने मेष राशीच्या मंडळींसाठी चांगले दिवस सुरु होऊ शकतात. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून लग्न भावात गोचर करत आहेत. यामुळे येत्या काळात आपल्या आयुष्यात प्रेमाची पालवी सजून निखळ आनंद वाढीस लागू शकतो.
-
या काळात तुम्ही मोठे निर्णय सहजपणे घेऊ शकाल आणि कामाच्या संदर्भात प्रवासाला जाण्याचीही शक्यता आहे. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा अधिक मजबूत होईल. गुंतवणुकीतून चांगला नफाही होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो.
-
शुक्र वृषभ राशीचा स्वामी आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या मंडळीना सर्वाधिक फायदा होऊ शकतो. या काळात नोकरदार लोकांना करिअरच्या नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.
-
या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीला अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचे रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. पालकांचे सहकार्य मिळू शकेल आणि त्यांच्या मदतीनं अनेक कामे पूर्ण होऊ शकतात.
-
मालव्य राजयोग बनल्याने या राशीच्या मंडळीसाठी अच्छे दिन सुरु होऊ शकतात. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीच्या कर्म भावात गोचर करणार आहेत. त्यामुळे करिअरमध्ये प्रगतीचा योग आहे. तुमच्या भाग्यात धनलाभाचे प्रबळ योग आहेत.
-
तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. वडिलांकडून चांगलं सहकार्य मिळू शकतं. तुमच्या आयुष्यात वैवाहिक सुखाचे योग आहेत. नोकरीच्या नव्या संधी तुम्हाला लाभू शकतात.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?