-
केस पांढरे किंवा राखाडी होण्याच्या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी सध्या अनेक उपाय करुन पाहिले जातात. यात काही जण आवळा- भृंगराज पावडर, खोबरेल तेल, तांदळाचे पाणी, रोझमेरी ऑइल हा पदार्थ मिक्स करुन त्याचा हेअर पॅक चालवण्याचा सल्ला देतात. पण त्यामुळे खरचं अकाली केस पांढरे किंवा राखाडी होण्याची समस्या खरेच दूर होते का? यावर द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीतून जाणून घेऊ…. (Photo Credit- Freepik)
-
हेअरमीगुड या इन्स्टाग्राम पेजवरून भावना मेहरा युजर्सने केस पांढरे आणि राखाडी होण्याच्या समस्यावर भृंगराज पावडर (२ टीस्पून) आवळा पावडर (१ टीस्पून) तांदळाचे पाणी किंवा रोझमेरी, खोबरेल तेल (१ टीस्पून) असा एक हेअर पॅक सुचवला आहे. (Photo Credit- Freepik)
-
केस धुण्याच्या एक तास आधी हा हेअर पॅक लावा. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा तो केसांवर वापरा असेही तिने सुचवले. पण हा खरचं इफेक्टिव्ह आहे का? यावर डॉक्टरांचे मत जाणून घेऊ.. (Photo Credit- Freepik)
-
त्वचारोग तज्ज्ञ व ट्रायकोलॉजिस्ट डॉ. वंदना पंजाबी यांच्या मते, केस राखाटी, पांढरे होण्यामागची कारणे ? – UV किरण, प्रदूषण, शारीरिक बदल, मद्यपान, धूम्रपान आणि जुनाट आजार यांचा परिणाम म्हणून ऑक्सिडेटिव्ह ताण निर्माण होतो; जो केस पांढरे होण्यास कारणीभूत ठरू शकतो. (Photo Credit- Freepik)
-
व्हिटॅमिन बी 12 आणि डी 3, कॉपर, लोह व कॅल्शियमची कमतरता, थायरॉईड , केमोथेरप्युटिक औषधे, बैठी जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी यांसारख्या इतर कारणांमुळे केस अकाली पांढरे होतात, असे डॉ. पंजाबी यांनी नमूद केले. (Photo Credit- Freepik)
-
अशावेळी आवळा, भृंगराज पावडर, खोबरेल तेल, आणि तांदळाचे पाणी किंवा रोझमेरीपासून बनवलेला हेअर पॅक केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. तसेच केसांचा रंग टिकवून ठेवण्यातही त्यातील प्रत्येक घटक गुणकारी ठरु शकेल, असे स्किन स्पेशालिस्ट, कॉस्मेटिक स्किन-सर्जन डॉ. रिंकी कपूर म्हणाल्या. (Photo Credit- Freepik)
-
भृंगराज; ज्याला आयुर्वेदात ‘औषधींचा राजा’ म्हणून ओळखले जाते; जे केसांच्या वाढीस मदत करते. ते केस अकाली पांढरे होण्यापासून रोखते आणि केसांच्या मुळांना पोषण देते, याशिवाय टाळूमध्ये रक्तप्रवाहाचे कार्य सुधारते, (Photo Credit- Freepik)
-
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे सर्वाधिक प्रमाण आहे; जे कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते आणि केस मजबूत करते. त्याचे अँटिऑक्सिडंट गुणधर्म ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात. यामुळे केस अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येपासून दूर राहता येते. (Photo Credit- Freepik)
-
रोझमेरी तेलाचा वापर अनेकदा रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, केसांच्या मुळांचे पोषण वाढवण्यासाठी आणि केस पातळ होण्यापासून रोखण्यासाठी केला जातो. त्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म मुक्त रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करू शकतात, असे डॉ. कपूर म्हणाले.(Photo Credit- Freepik)
-
खोबरेल तेल हे एक लोकप्रिय नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे; जे केसांमधील प्रथिने कमी होण्यास प्रतिबंध करते, केस मजबूत आणि निरोगी ठेवते. त्यामुळे पर्यावरणीय घटकांमुळे होणारे नुकसानही कमी होऊ शकते, असे डॉ. कपूर म्हणाल्या.(Photo Credit- Freepik)
-
डॉ. कपूर यांच्या मते, तांदळाच्या पाण्यात केसांच्या वाढीस प्रोत्साहन देणारे अनेक नैसर्गिक घटक आहेत. त्यातील इनोसिटॉल, कर्बोदके खराब झालेले केस मजबूत आणि दुरुस्त करण्यास मदत करतात. तांदळाच्या पाण्यातील अॅमिनो अॅसिड केस आणि टाळूचे पोषण करू शकतात.(Photo Credit- Freepik)
-
डॉ. कपूर म्हणाल्या की, वरील हेअर पॅक नियमितपणे वापरल्याने केसांना योग्य पोषण मिळू शकते, केस मजबूत होतात आणि अकाली पांढरे होण्याची शक्यता कमी होत; ज्यामुळे केस चमकदार आणि दाट होतात. (Photo Credit- Freepik)
-
परंतु कोणतेही तेल किंवा हेअर पॅक वापरण्यापूर्वी हेअर एक्स्पर्ट, स्किन स्पेशलिस्ट किंवा तुमच्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानंतर केसांवर विविध उपाय ट्राय करा, असा सल्लाही वरील डॉक्टरांनी दिला आहे. (Photo Credit- Freepik)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा