-
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली राशी बदलतो. हे ग्रह आपली चाल बदलून राशींमध्ये राजयोग निर्माण करतात.
-
ज्योतिषशास्त्रानुसार, १९ मे रोजी सुखसोयी देणारा शुक्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.
-
वृषभ राशीमध्ये गुरु आधीच उपस्थित आहे. शुक्र प्रवेशानंतर वृषभ राशीमध्ये गुरू आणि शुक्र यांचा युती होऊन मालव्य राजयोग आणि गजलक्ष्मी राजयोग निर्माण होईल.
-
हा राजयोग काही राशींसाठी अतिशय शुभ ठरु शकतो. या राशींना मोठा धनलाभ आणि अपार यश लाभण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया, या भाग्यशाली राशी कोणत्या…
-
वृषभ राशीच्या लोकांना शुक्राच्या गोचरमुळे खूप फायदा होऊ शकतो. यावेळी तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला ठरु शकतो. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो.
-
सिंह राशीच्या लोकांना वृषभ राशीत तयार झालेल्या मालव्य राजयोगाचा फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात. या काळात प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे.
-
मालव्य राजयोग कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देणारा ठरु शकतो. आर्थिक स्थिती सुधारुन उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा