-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. गुरू सध्या वृषभ राशीत असून तो १४ मे २०२५ रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत गुरू एक वर्ष राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
त्यामुळे या राशीत गुरू आणि शुक्राची युती निर्माण होईल, गुरू-शुक्राची युती गजलक्ष्मी राजयोग निर्माण करते. हा योग अत्यंत शुभ आणि भाग्यकारी मानला जातो.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
जेव्हा गुरू आणि शुक्र एकमेकांच्या केंद्र भावात, समोरासमोर किंवा पहिल्या, चौथ्या, सातव्या घरात असतात तेव्हा हा गजलक्ष्मी राजयोग निर्माण होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी गजलक्ष्मी राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. पैशांची तंगी दूर होण्यास मदत होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
तूळ राशीच्या व्यक्तींना गजलक्ष्मी राजयोग भाग्यकारी ठरेल. हा या काळ तुमच्यासाठी भौतिक सुखाची प्राप्ती करून देणारा असेल. या युतीच्या प्रभावाने तुमच्या आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. धार्मिक कार्यात अधिक रस निर्माण होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी गजलक्ष्मी राजयोग खूप फायदेशीर ठरेल. या योगाच्या प्रभावाने तुमच्या देवी लक्ष्मीची कृपा होईल. त्यामुळे या काळात अचानक धनलाभ, भौतिक सुखाची प्राप्ती होईल. अनेक दिवसांपासून अडकलेले कामही पूर्ण होण्यास मदत मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल