-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
पंचांगानुसार, सूर्य सध्या कर्क राशीत विराजमान असून तो प्रत्येक महिन्यात विविध ग्रहांबरोबर युती निर्माण करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
२४ जुलै रोजी रात्री १० वाजून ५९ मिनिटांनी सूर्य-वरूण एकमेकांबरोबर १२० डिग्रीवर असतील. यामुळे नवपंचम राजयोग निर्माण करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
मेष राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य-वरूणची युती खूप लाभदायी असेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. भौतिक सुखात वाढ होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य-वरूणची युती विशेष लाभदायी होईल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीसाठी सूर्य-वरूणाची युती अत्यंत शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच, बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Horoscope Today Live Updates: कामिका एकादशीला मनातील इच्छा होईल पूर्ण; तुमच्या नशिबात आज नेमकं काय? वाचा १२ राशींचे राशिभविष्य