मनसे कामगार सेनेतर्फे शेतकरी मोर्चाला आलेले ३० हजार शेतकरी महिला बांधव शनिवारी मुंबईत पोहोचले. यावेळी त्यांना मनसेकडून पाणी आणि खाद्यपदार्थ देण्यात आले. -
मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे हाल होऊ नयेत म्हणून मनसेने अतिशय चांगले नियोजन केले होते. यासाठी कार्यकर्त्यांची फळी अहोरात्र काम करत होती.
-
अखिल भारतीय किसान सभेच्या पुढाकारातून हा मोर्चा काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी हा मोर्चा १२ मार्चला विधान भवनावर धडकणार आहे.
-
खाद्यपदार्थ योग्य पद्धतीने प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतील याची व्यवस्था पक्षाने केली होती. तसेच सहभागी बांधवांनीही आपापल्या परिने या कामाला हातभार लावला.
रात्रीच्या वेळी मोर्चेकऱ्यांसाठी अशाप्रकारे अन्न शिजत होते. उन्हातान्हाची तमा न बाळगता राज्यभरातून आलेल्या बळीराजाची काळजी घेतली गेली. या मोर्चाला शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. -
जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या हक्काच्या मागण्या शासनाकडून पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी हिंमत एकवटली असून मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी काही काळासाठी विसावा घेतला.

Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार