-
भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले मुकेश अंबानी व त्यांची पत्नी नीता अंबानी यांची प्रचिती जगभरात आहे. सर्वांत श्रीमंत होण्याचं स्वप्न अनेकांचं असतं पण सर्वांत श्रीमंत असलेल्या व्यक्तीचं काय स्वप्न असेल असा प्रश्न तुम्हाला पडतो का?
मुकेश अंबानी व नीता अंबानी यांना एका मुलाखतीत, तुम्ही तुमची स्वप्न कशी पूर्ण करत असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर या दाम्पत्याने दिलेल्या उत्तराने श्रोत्यांची मनं जिंकली. 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत नीता अंबानी म्हणाल्या, "आमच्या स्वप्नांच्या यशाचा मूलमंत्र हा पार्टनरशिप आहे. आमच्या नात्यात एकमेकांना आपली मतं मांडण्याचा, आपले विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आणि स्वातंत्र्य आहे. प्रत्येक बाबींवर आम्ही मनमोकळेपणाने चर्चा करतो." नीता यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयात मुकेश त्यांची साथ देतात, असं त्यांनी सांगितलं. "माझ्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये ते माझी साथ देतात आणि मला प्रोत्साहित करतात. मी सर्वोत्तम काम करू शकेन यासाठी ते माझ्या पाठीशी कायम उभे राहतात." मुकेश अंबानी व नीता अंबानी हे पती-पत्नी म्हणून व मुलांचे पालक म्हणून एकमेकांना नेहमी समजून घेतात आणि प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगतात. स्वप्नांविषयी नीता अंबानी पुढे म्हणाल्या, "आमच्यासाठी आमची वैयक्तिक स्वप्न नसून ती संपूर्ण आमच्या कुटुंबाची आहेत. ती पूर्ण करण्यासाठी मुलंसुद्धा हातभार लावतात." सर्व छायाचित्र सौजन्य- सोशल मीडिया

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”