-
मुंबई : मिठी नदीच्या तिराजवळ वसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये सध्याच्या लॉकडाउनच्या काळात भयान शांतता आहे. इतल्या लोकांना इतरत्र सध्या कामचं नसल्याने ते आपल्या झोपड्यांमध्ये केवळ बसून वेळ घालवत आहेत. (सर्व छायाचित्रे – प्रशांत नाडकर)
-
मुंबईतील कचरा आणि सांडपाणी वाहुन नेण्याचं काम सध्या या नदीतून सुरु आहे. त्यातच गरिब बेघर लोकांनी नदीच्या तिरावरच झोपड्या थाटून आसरा घेतल्यानं हा परिसर अतिशय बकालं बनला आहे.
-
एकीकडे मुंबईतील टोलेजंग इमारती आणि दुसरीकडं बकाल परिसर अशी परिस्थिती आहे.
-
मिठी नदीच्या तिरावरच अवघं मुंबई शहर वसलेलं आहे. शहरातून वाहणारी ही मुख्य नदी आहे. मात्र, आता तिची अवस्था जिवंत जलस्त्रोतापेक्षा एखाद्या गटारासाखी झाली आहे.
-
लॉकडाउनमुळं सध्या अवघी मुंबई एकाच जागी स्तब्ध झाली आहे. त्यामुळं या शहरानं कधीही न थांबण्याच्या आपलाचं नियमं मोडला आहे.
-
मिठी नदीच्या तिरावर राहणाऱ्या या एका वर्गाप्रमाणे अनेक भागातील गरीब आणि बेघर लोक सध्या आरोग्याच्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
-
इतरही काही तरुण मुलं आणि माणसं लॉकडाउनमुळं सध्या निवांत आहेत. मुलं तर फिजिकल डिस्टंसिंगचं पालन न करता गप्पा मारताना दिसत आहेत. तर एक माणून भल्या मोठ्या बोचक्यावर निवांत पहुडला आहे.
-
करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य लोक वैयक्तिक स्वच्छता आणि मास्क लावण्यासंबंधी आग्रही आहेत. मात्र, इथल्या चिमुकल्यांना याचा मागमूसही नाही. त्यामुळं त्यांच्या आरोग्यासाठी हे धोकादायक बनलं आहे.
-
सध्याच्या लॉकडाउनच्या काळात या वस्त्यांमध्ये राहणारी मुलं याच परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर खेळताना दिसत आहेत.
-
सध्याच्या लॉकडाउनच्या परिस्थितीमुळं इथल्या लोकांना एक वेगळीच शांत मुंबई अनुभवायला मिळत आहे.

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट