-
१५ जून २०२० च्या रात्री गलवान व्हॅलीत झालेला संघर्ष कुणीही विसरू शकत नाही. सीमेवर झालेल्या वादानंतर चीन-भारत यांच्यातील सैन्य एकमेकांना भिडलं. रात्रीच्या काळोखात झालेल्या या रक्तरंजित संघर्षात भारताच्या २० सुपूत्रांनी देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिलं. त्याचबरोबर चीनच्याही काही सैनिकांना यमसदनी पाठवलं. (फोटो सौजन्य : एएनआय)
-
गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. बदल्याची भाषा बोलली जाऊ लागली. त्यानंतर चीन-भारत सीमेवरील तणावही वाढला. मात्र, लष्करी पातळीवरील चर्चा सुरू होती. ती अजूनही आहे.
-
या संघर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (३ जुलै रोजी) अचानक देशवासीयांसह चीनलाही धक्का दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह, लडाखचा दौरा करून सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला.
-
इतकंच नाही तर गलवान व्हॅलीतील संघर्षात जखमी झालेल्या जवानांचीही भेट घेतली.
-
देशाच्या सीमेच रक्षण करताना भारतीय जवानांनी चिनी सैन्याविरुद्ध दाखवलेल्या शौर्याची पंतप्रधान मोदी यांनी दखल घेतली. त्याचबरोबर जवानांचं मनोधैर्य वाढवत त्यांना लढण्यासाठी बळ दिलं.
-
लेहमध्ये आज अचानक जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी उपचार घेत असलेल्या जवानांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
-
"लडाखमधल्या जवानांचं शौर्य हे हिमालयातल्या पर्वतरागांपेक्षा मोठं आहे", अशा भावना यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या.
-
"आपला देश कोणत्याही जागतिक संकटापुढे झुकलेला नाही, झुकणार नाही. आज मला तुमचा आणि तुमच्या मातांचा अभिमान आहे, ज्यांनी तुमच्यासारख्या शूर वीरांना जन्म दिला", असंही मोदी म्हणाले.
-
"तुम्ही सगळे लवकर बरे व्हा", अशा सदिच्छाही मोदी यांनी यावेळी उपचार घेत असलेल्या जवानांना दिल्या.
-
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सीमेवर निर्माण झालेल्या तणावासंदर्भात लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर सीमेपलीकडून कुरापती करणाऱ्या राष्ट्रांना इशाराही दिला.

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS