-
दहीहंडीला ‘साहसी खेळा’चा दर्जा दिल्यामुळे हा खेळ ऑलंपिकमध्ये पोहोचेल असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.
-
दहीहंडीच्या माध्यमातून देशाचे नाव जागतिक पातळीवर जाईल, असा दावा सामंत यांनी यावेळी बोलताना केला.
-
दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देऊन त्यासाठी सरकारी नोकऱ्यांत आरक्षण देण्याच्या एकनाथ शिंदे- फडणवीस सरकारच्या निर्णयावर राज्यभरातून टीकेची झोड उठली आहे.
-
क्रीडा, राजकीय, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांतून या निर्णयास विरोध होत आहे.
-
त्यामुळे कोंडीत सापडलेल्या सरकारच्या विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बचावासाठी उदय सामंत आणि आमदार प्रताप सरनाईक पुढे आले.
-
दहीहंडी फोडणाऱ्या गोंविंदासाठी नोकरीत आरक्षण जाहीर करण्यात आल्याने काहींचा गैरसमज झाला आहे, असं सामंत म्हणाले आहेत.
-
सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून दहीहंडी या खेळाबाबतची नियमावली तयार केली जाणार आहे, असं सामंत म्हणाले.
-
क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करून क्रीडा खाते तयार करणार आहे, असंही त्यांनी शिंदे सरकारच्या या निर्णयाबद्दल बोलताना स्पष्ट केलं आहे.
-
दहीहंडीसंदर्भात ही नियमावली तयार करताना वयोगट, शिक्षण, विभाग, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा याचा विचार करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.
-
त्यामुळे शिक्षण आणि अन्य निकष पूर्ण करणाऱ्या गोविंदाना अन्य खेळाडूंप्रमाणे नोकरी मिळेल असेही सामंत यांनी शिंदे सरकारची बाजू मांडताना यावेळी स्पष्ट केले.
-
या खेळासाठी पाच टक्के आरक्षण दिलेले नाही तर खेळाडूंसाठी जे पाच टक्के आरक्षण आहे, त्यात कबड्डी, खोखोप्रमाणेच दहीहंडीचा समावेश करण्यात येणार आहे, असंही सामंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाच्या बाजूने बोलताना स्पष्ट केलं.
-
त्यामुळे खेळाडू आणि राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नसल्याचेही शिंदे सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या सामंत यांनी सांगितले.

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक