राज्यातील अंदाजे २ कोटी घरगुती वीज ग्राहकांच्या वीज वापराची बिले अंदाजापेक्षा जास्त आलेली आहेत. त्यामुळे प्रचंड संभ्रम आणि असंतोष निर्माण झालेला आहे. प्रत्यक्षात या बिलांतील वाढीची दोन प्रमुख कारणे आहेत, असं वीजतज्ज्ञांचं म्हणणं आहे. भरमसाठ वीज बिलांमुळे सध्या निर्माण झालेल्या या परिस्थितीवर या व्हिडिओतून सविस्तर भाष्य करण्यात आलं आहे. पहा, वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे काय म्हणतात.