शेतकरी व दिव्यांगांसाठीच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलं होतं. आज मंत्री उदय सामंत यांनी मागण्यांसंदर्भात आश्वासन दिल्यानंतर बच्चू कडूंनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आपण आंदोलन मागे घेत नाही आहोत, तर पुढे ढकलतोय, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच सरकारला अल्टिमेटमदेखील दिला आहे.