scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

महाराष्ट्र सरकार News

१ मे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यांची स्थापना झाली. तेव्हापासून या राज्यामध्ये भारतीय संविधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे लोकशाहीच्या पद्धतीने राज्य सरकार संपूर्ण कारभार पाहते. महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळामध्ये विधानसभा व विधान परिषद ही दोन सभागृहे आहेत. संसदीय व्यवस्थेनुसार, महाराष्ट्रामध्ये दर पाच वर्षांनी विधानसभा निवडणूका घेतल्या जातात. यातून २८८ जागांसाठी उमेदवार निवडणूक लढवतात. पुढे मतमोजणी झाल्यानंतर सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष सत्तेवर येतो. काही वेळेस पूर्ण बहुमत न मिळाल्याने विविध पक्ष युती करत सरकार स्ठापन करतात. काही वेळेस विधानसभा सदस्यांच्या गटाद्वारे देखील सरकार स्थापन करता येते. सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षाद्वारे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात येते. मुख्यमंत्री त्यांच्या सहकाऱ्यांची म्हणजेच कॅबिनेट मंत्रिमंडळातील मंत्र्यांची निवड करतात. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतराव चव्हाण यांना मिळाला होता. १९६० ते १९९४ पर्यंत महाराष्ट्रामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. १९९५ मध्ये शिवसेना पक्षाचे मनोहर जोशी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. तेव्हा पहिल्यांदा कॉंग्रेस पक्ष विरोधा गटात बसला होता. त्यानंतर १९९९ ते २०१३ पर्यंत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युतीने महाराष्ट्रावर राज्य केले. २०१४ मध्ये मोदी लाटेसह भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता स्थापना केली. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. २०१९ च्या विधानसभा निवडणूकांच्या वेळी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये फुट पडली. यातून शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार उभे केले. तेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची संधी प्राप्त झाली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर हे सरकार पडले. पुढे शिंदे गटाने भाजपबरोबर युती करत जून २०२२ मध्ये सत्तास्थापनेची घोषणा केली. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, तसेच भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. Read More
Manoj Jarange Patil's Maratha Reservation Protest
“दक्षिण मुंबईत आंदोलने करण्यास बंदी घाला”, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर शिंदे गटाच्या खासदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Manoj Jarange Patil’s Protest Azad Maidan: मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी राज्यातून लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाले…

manoj jarange patil,
सरकार शांत, जरांगे ठाम; मंत्र्यांकडून अद्याप मनोज जरांगेंशी चर्चाच नाही

मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण द्यावे या मागणीवर जरांगे हे ठाम आहेत. परंतु ही मागणी तात्काळ मान्य करता येणार नाही.

Manoj Jarange
शिंदे समितीला चर्चा करण्याचा अधिकारच नाही; जरांगेंनी फेटाळला न्या. शिंदे समितीकडून आलेला राज्य सरकारचा प्रस्ताव

मराठा आंदोलकांशी चर्चा करण्याचा न्यायमूर्ती शिंदे समितीला कोणताही अधिकार नाही. मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उप समिती किंवा सरकारमधील मंत्र्यांनी थेट…

Maratha Reservation Protest
“मराठा आंदोलनादरम्यान मुंबईत पाणपोया, हॉटेलं बंद; स्वच्छतागृहांना कुलुपं, अन्…”, रोहित पवारांचा गंभीर आरोप

Rohit Pawar on Maratha Protest : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले…

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : “सरकार दगाफटका करण्याचा डाव आखत असेल तर…”; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil Protest Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

samruddha panchayatraj campaign
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाला राज्य सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारच्या वतीने सेवा पंधरावडा साजरा केला जातो.

minister Radhakrishna Vikhe news in marathi
मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यास तयार; राधाकृष्ण विखे, मागण्यांबाबत सरकार संवेदनशील

‘हैदराबाद गॅझेट’वर न्यायमूर्ती शिंदे समितीचा अभ्यास सुरू असून, त्यांचा अहवाल येईपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आल्याचे त्यांनी…

bacchu kadu announces statewide farmer protest in mumbai
शेतकरी – शेतमजूर हक्क संघर्ष समितीचे २८ ऑक्टोबरला मुंबईत ठिय्या आंदोलन…

शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी २८ ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन पुकारले आहे.

Manoj Jarange Mumbai Protest
‘मराठा आरक्षणा’वरून सरकार उलथून टाकू; मनोज जरांगेंचा इशारा; मुंबईतील उपोषणावर ठाम…

२९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषण करणार, मुख्यमंत्र्यांनी आडमुठेपणा सोडून मराठा आरक्षण द्यावे, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी केली.

manoj jarange issues warning to maharashtra government devendra fadnavis cm
“आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही”, मनोज जरांगे यांचा संदेश; मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत टीका!

देवेंद्र फडणवीस यांनी जाणूनबुजून आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी लोक पाठवल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.