scorecardresearch

नाशिक न्यूज News

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला नाशिक (Nashik) शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर मिळतील. नाशिक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील आणि भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक शहर आहे. देशात सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरामध्ये मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी बौद्ध लेणी, उत्तरेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे, तर पश्चिमेस त्र्यंबकेश्वर आहे. पंचवटी हादेखील नाशिक शहराचा एक भाग आहे. पौराणिक संदर्भांनुसार वनवासाच्या काळात रामाने येथे वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


नाशिक शहराच्या नावामागे दोन कथा प्रसिद्ध आहेत. एका कथेचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले आहे. दुसऱ्या मान्यतेनुसार नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे.

आजही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून, ते भारतातील वेगाने विकसित असलेल्या शहरांपैकी एक आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता


Read More
खंडणीसाठी टोळक्याचा हॉटेलमध्ये धुडगूस, चौघे अटकेत

थोरात यांनी नकार दिल्याने संतप्त टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. थोरात यांना शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी देत…

average price of onion
कांदा दरात २५० रुपयांनी घसरण… शेतकरी देवेंद्र फडणवीस यांना लासलगावला का बोलावताय ?

जुलैच्या मध्यावर कांद्याला दीड हजार रुपये दर होता. उन्हाळ कांद्याचा हंगाम सुरु झाल्यापासून सरासरी दर एक ते दीड हजार रुपयांच्या…

वसतिगृहांमधून विद्यार्थ्यांना घरी नेण्यास सुरुवात; आश्रमशाळा बंदचा परिणाम

आदिवासी आश्रमशाळा कंत्राटी कर्मचारी वर्ग तीन व चार यांचे २१ दिवसांपासून नाशिक येथील आदिवासी विकास भवन परिसरात बिऱ्हाड ठिय्या आंदोलन…

transfer session exposed brokers demanding money from officers and employees for securing transfers
नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिसांची आता गावोगावी…

गावातील एखाद्या प्रकरणात निष्पक्षपणे कारवाईसाठी जनसंवाद अभियानाची पोलिसांना मदत होऊ शकेल. तसेच थेट पोलीस ठाण्यात न जाताही नागरिकांना पोलिसांपर्यंत आपले…

MLA Nitin Pawar locked Tribal Integrated Development Project office
आमदार नितीन पवारांकडून कळवण प्रकल्पासह आश्रमशाळांना कुलूप

शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी नसल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान, त्यांची परवड याकडे लक्ष वेधत प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा निषेध नोंदविण्यासाठी आंदोलन करण्यात…

Tomatoes become expensive due to rain What is the price of one kg of tomatoes
पावसामुळे टोमॅटो महाग…एका किलोचे दर किती ?

संततधार पावसामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान होत असल्याने जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आवक घटल्याचा परिणाम किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर वाढण्यात…

Sushil Marg in Deolali military area closed for matches
देवळाली लष्करी हद्दीतील कागदोपत्री खुल्या रस्त्याची कथा…

देवळाली छावणी परिषदेच्या हद्दीतील सुशील मार्ग हा सामांन्यांसाठी कागदोपत्री खुला असला तरी गेल्या चार वर्षापासून प्रत्यक्षात तो बंद आहे.

pasha patel , onion policy Maharashtra, Maharashtra onion committee, onion farmers issues
भाजपचे पाशा पटेल यांच्यावर कांदा उत्पादकांचा रोष का ?

कांदा विषयक अभ्यास मर्यादित असून प्रत्यक्ष कांदा उत्पादकाच्या समस्यांशी पाशा पटेल यांचा थेट संबंध नाही, असा आक्षेप महाराष्ट्र राज्य कांदा…

Khadse vs Mahajan feud escalates after rave party incident
खडसे यांचे जावई लहान मूल आहे का ?… पुण्यातील पार्टीवरून गिरीश महाजन असे का म्हणाले ?

आमदार एकनाथ खडसे यांच्या जावयाला रात्री पोलिसांनी पुण्यात रेव्ह पार्टीतून ताब्यात घेतल्याने महाजन-खडसे वादाला आणखी वेगळे वळण…

Khairwadi villagers question government commitment
नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन हवेतच…खैरैवाडीचा प्रवास ओहळांमधून, चिखलांमधून…

लोकप्रतिनिधींप्रमाणेच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनही केवळ आश्वासनेच दिली जात असल्याचा अनुभव खैरेवाडीतील आदिवासींना आला.