‘तांडव’ वेब सीरिजमध्ये झळकलेली अभिनेत्री कृतिका कामरा सध्या तिच्या खाजगी आयुष्यामुळे बरीच चर्चेत आलीय. गेल्या काही दिवसांपासून कृतिकाचं नाव उदय सिंह गौरीसोबत जोडलं जात होतं. या दोघांचा साखरपुडा देखील झाल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येऊ लागल्या होत्या. यावर जेव्हा अभिनेत्री कृतिका कामराला विचारण्यात आलं तेव्हा तिने भलतीच उत्तरं दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छोट्या पडद्यावरील सुपरहिट मालिका ‘कितनी मोहब्‍बत है’ मधली अभिनेता करण कुंद्रा आणि अभिनेत्री कृतिका कामरा यांची जोडी लोकांच्या मनात बसली होती. याच दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात सुद्धा पडले. २००९ मध्ये ते दोघे एकमेकांसोबत डेटिंग सुद्धा करू लागले होते. पण काही वर्षानंतरच ही जोडी एकमेकांपासून वेगळी झाली. करण कुंद्रासोबत ब्रेकअप केल्यानंतर कृतिका उदय सिंह गौरीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.

नुकतीच कृतिकाने एका माध्यमाला मुलाखत दिली. या मुलाखतीत कृतिकाला जेव्हा उदय सिंह गौरीसोबतच्या रिलेशनशिपबद्दल विचारलं त्यावेळी ती विषय टाळताना दिसून आली. “जेव्हा काही ठाम ठरेल तेव्हाच मी याबद्दल तुम्हाला सांगू शकते “, असं यावेळी कृतिका म्हणाली. त्यानंतर तिला उदय सिंह गौरीसोबतच्या साखरपुड्याबाबत विचारलं तेव्हा यावर ती म्हणाली, “नाही, माझा साखरपुडा झालेला नाही…मला माहित नाही या सगळ्याची सुरवात कुठून झाली, माझा साखरपुडा झाला नाही आणि लग्न सुद्धा झालं नाही.”, असं म्हणत कृतिकाने साखरपुडा झाल्याची केवळ अफवा असल्याचं सांगितलं.

रिलेशनशिपवर नाही दिलं उत्तर…
कृतिकाला जेव्हा उदय सिंह गौरीसोबतच्या नात्याबद्दल विचारलं तेव्हा तिने आधी विषय टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर यावर स्पष्ट उत्तर न देता म्हणाली, “सध्या आम्ही आयसोलेटेड आहोत आणि मी इथे मुंबईत माझ्या घरी आहे. मी आतापर्यंत माझं आयुष्य खुल्या मनाने जगले आहे आणि कोणत्याच गोष्टी लपवून ठेवल्या नाहीत. माझ्या खाजगी आयुष्यात सध्या असं काही नाही जे तुमच्यासोबत शेअर करू शकेल…जेव्हा केव्हा शेअर करण्यासारखं असेल तेव्हा मी नक्की सांगेल.”

अजुनही सिंगल आहे कृतिका ? दिलं हे उत्तर
कृतिका कामरा संपुर्ण मुलाखतीत उत्तरं जिलेबी सारखे गोलगोल फिरवताना दिसून आली. ती अजुनही सिंगल आहे का? असा प्रश्न जेव्हा तिला केला तेव्हा ती म्हणाली, “असेलही आणि नसेलही”. यावेळी कृतिकाने ज्या पद्धतीने उत्तरं दिली आहेत, त्यावरून तरी तिला उदय सिंह गौरीच्या विषयावर बोलण्याची इच्छा नसल्याचं दिसून आलं. संपूर्ण मुलाखतीत तिने एकदाही उदय सिंह गौरीचं नाव घेतलं नाही.

करण कुंद्रासोबत देखील होती रिलेशनशिपमध्ये
यापुर्वी कृतिका करण कुंद्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती. ‘कितनी मोहब्बत है’ या मालिके दरम्यान दोघांची पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर दोघेही त्यांच्या कामांमध्ये इतके व्यस्त होऊ लागले की दोघांना भेटण्यासाठी वेळच मिळत नव्हता. त्यामूळे त्यांच्या नात्यात दिवसेंदिवस दुरावा वाढू लागला. हा दुरावा काही दिवसानंतर ब्रेकअपमध्ये बदलला. एका मुलाखतीत बोलताना कृतिकाने सांगितलं होतं की, त्या दोघांमध्ये कोणतीच भांडणं झाली नाहीत. ते दोघे एकमेकांसोबत कायम असायचे. एकमेकांना भावनिक आधार देत असायचे. यावेळी कृतिकाने दोघांच्या नात्याला वाचवू न शकल्याचं दुःख देखील व्यक्त केलं होतं.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tandav fame kritika kamra break up with uday singh gauri spills the beans on engagement prp