
नवरात्रोत्सवाचं महत्त्व जाणून श्री गुरुदेव दत्त या मालिकेतील अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीने देवीची नऊ रुपं धारण केली आहेत. यातलं पहिलं रुप आहे 'शाकंभरी देवी'चं. शत वर्षे दुष्काळाने जन पीडित झाले असताना देवीने शाक म्हणजेच भाजी पुरवून सर्वांची क्षुधा शांत केली. म्हणूनच या देवतेला शाकंभरी देवी म्हटलं जातं. देवीच्या या रुपाला 'गंगम्मा देवी' असंही म्हटले जाते. दरवर्षी शाकंभरी देवीच्या उत्सवाला सर्व भाज्यांनी सजावट केली जाते 
दुसरं रुप आहे ब्रह्मचारिणी दुर्गेचं. नवशक्तींपैकी 'ब्रम्हचारिणी' हे दुर्गेचं दुसरं रूप आहे. येथे 'ब्रह्म' या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. नवरात्राच्या दुसर्या दिवशी या मातेची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचं मन 'स्वाधिष्ठान' चक्रात स्थिर होते. या चक्रात मन स्थिर करणार्याला तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होते. या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे. 
तिसरं रुप आहे 'माता वैष्णव देवी'चं || ॐ सहस्त्र शीर्षाः पुरुषः सहस्त्राक्षः सहस्त्र-पातस-भूमिग्वं सव्वेत-स्तपुत्वा यतिष्ठ दर्शागुलाम्। आगच्छ वैष्णो देवी स्थाने-चात्र स्थिरो भव।। भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारं देवीचं हे रुप. 
चतुर्थ रुप आहे 'मरियम्मा देवी'चं. मरियम्मा ही तमिळ प्रांतातील देवी आहे, ज्याची उपासना पूर्व-वेदिक भारतात सुरु झाली. मरी या शब्दाचा अर्थ आहे "पाऊस" आणि अम्माचा अर्थ "आई" आहे. तामिळनाडूच्या ग्रामीण भागात 'मरियम्मा देवी' आई म्हणून ओळखली जाते. 
पाचवे रुप आहे 'यलम्मा देवी'. यल्लम्मा देवी हे कालीचेच रूप मानले जाते. ग्रामीण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात यलम्मा देवीचे उपासक आढळतात. यल्लम्मा देवीचा एक हात अहंपणाचा नाश करणारा आहे, आणि दुसरा हात हा भक्तांवर वरदहस्त दाखवणारा आहे. यल्लम्मा देवीची दक्षिण भारतात मुख्यत्वे पूजा होते. 
सहावं रुप आहे कोल्हापुरात वसलेली "आई जगदंबा". प्राचीन करवीर नगरीतील या अंबाबाईचा उल्लेख पुराणातही सापडतो. पुराणानुसार आदिशक्तीची एकशे आठ ठिकाणे आहेत. त्यांच्यापैकीच करवीर क्षेत्रास विशेष महत्व आहे. सहा शक्तीपीठांपैकी हे एक असून येथे इच्छापूर्तीसोबतच मनःशांतीही मिळते. 
सातवं रुप आहे 'कालीमाते'चं. दुष्टांच्या अंतासाठी देवीने हे रुप धारणं केल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो. 
आठवं रुप आहे 'महागौरी'. आई दुर्गाच्या आठव्या शक्तीचे नाव महागौरी आहे. दुर्गापूजनाच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा करण्याचा नियम आहे. त्यांची शक्ती अस्सल आणि सदा फळ देणारी आहे. त्यांची पूजा केल्यास भक्तांचे सर्व कलमाश वाहून जातात, विनाशपूर्व पापांचेही नाश होतात. भविष्यात पाप आणि दु: ख त्याला मिळत नाही. सर्व बाबतीत तो पवित्र आणि गुणांचा मालक बनतो. महागौरी जीचा रंग अतिशय तेजस्वी आहे, तिचा रंग चंद्र प्रकाशात पांढरा आणि कुंदा उमलणल्यासारखा दिसतो, तिला मन प्रसन्न होते. गौरी देवीचे वाहन बैल व सिंह दोन्ही आहे. 
नववं रुप आहे महालक्ष्मी. देवीची ही नऊ रुपं कधी आई, कधी बहिण, कधी सखी तर कधी पत्नी अश्या विविध रुपात आपल्या सभोवताली वावरत असतात. त्यांचा सन्मान हीच खरी देवीची उपासना आहे.
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा