-
प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७४ वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वी बालसुब्रमण्यम यांनी करोनावर मात केली होती. (सर्व फोटो – इंडियन एक्स्प्रेस, एस.पी.बालसुब्रमण्यम, इन्स्टाग्राम)
-
मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
-
एसपी बालसुब्रमण्यम हे ९० च्या दशकातील सलमान खानचा आवाज म्हणून ओळखले जायचे. जवळपास एका दशकाहून अधिक काळ त्यांनी सलमानसाठी गाणी गायली.
-
मैने प्यार किया या चित्रपटातील दिल दिवाना या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअरचा उत्कृष्ट गायकाचा पुरस्कारही मिळाला.
-
एस.पी.बालसुब्रमण्यम यांचा जन्म ४ जून १९४६ रोजी आंध्र प्रदेशातील नेल्लूर येथे झाला. १५ डिसेंबर १९६६ रोजी त्यांनी श्री श्री श्री मर्यादा रामण्णा या तेलगू चित्रपटाद्वारे पार्श्वगायक म्हणून पदार्पण केलं.
-
१९६९ मध्ये त्यांना आपलं पहिलं तामिळ गाणं रकॉर्ड करण्याची संधी मिळाली. एयर्कई एन्नुम इलाया कन्नी असं ते गाणं असून यात तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार जैमिन गणेशनदेखील होते.
-
१९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या संकराभारनाम या चित्रपटातून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. या चित्रपटातील गाण्यासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.
-
यानंतर बालसुब्रमण्यम यांना दक्षिणेकडील स्टार एमजीआरच्या इरम निलावे वा या चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. या चित्रपटात जयललितादेखील मुख्य भूमिकेत होत्या.
-
पण दुर्दैवाने रेकॉर्डिंगपूर्वी बालसुब्रमण्यम यांना टायफॉईड झाला. यामुळे ते निराश झाले. परंतु एमजीआर मागे हटले नाहीत.
-
टायफॉयडमधून बरे होऊन ते परत येईपर्यंत एमजीआर यांनी चित्रीकरण पुढे ढकलण्याचा आणि त्यांनाच गाण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला.
-
ते यातून बरे झाल्यानंतर जयपूरमध्ये चित्रीकरण झालेलं हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं.
-
त्यांनी आपल्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत तेलुगु, तामिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळम अशा चित्रपपटांमध्ये ४० हजार गाणी गायली.
-
कन्नड संगीतकार उपेंद्र कुमार यांच्यासाठी त्यांनी १२ तासांमध्ये २१ गाणी स्वरबद्ध केली. यासाठी त्यांचं नाव गिनिज बुक ऑफ वर्ल़्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आलं.
-
अनेकदा बालसुब्रमण्यम यांनी एकावेळी अनेक भाषांमध्ये १६-१७ गाणीही स्वरबद्ध केली आहेत. अनेकदा त्यांनी १७ तास सलगही गाणी गायली आहेत.
-
१९९२ मध्ये बालसुब्रमण्यम यांनी ए.आर.रेहमान यांच्यासोबत रोजा या चित्रपटात पहिल्यांदा काम केलं.
-
१९९२ मध्ये बालसुब्रमण्यम यांनी ए.आर.रेहमान यांच्यासोबत रोजा या चित्रपटात पहिल्यांदा काम केलं.
-
रोजा हा चित्रपट तिनही भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. त्या सर्वांसाठी त्यांनी गाणी गायली होती. तसंच यानंतर दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं.
-
बालसुब्रमण्यम हे उत्कृष्ट गायक तर होतेच. परंतु याव्यतिरिक्त त्यांनी तामिळ, तेलुगु, कन्नड आणि हिंदी भाषेतील ४० पेक्षा अधिक चित्रपटांना संगीतही दिलं होतं.
-
९० च्या दशकात जेव्हा ते सलमान खानचा आवाज म्हणून ओळखले जायचे तेव्हा त्यांनी यातून ब्रेक घेतसा. त्यांना पूर्णवेळ अभिनेता होण्याचीही इच्छा होती. त्यानंतर त्यांनी ७२ चित्रपटांमध्ये अभिनयही साकारला होता.
-
१५ वर्षांच्या ब्रेकनंतर त्यांनी २०१३ मध्ये गायक म्हणू चेन्नई एक्स्प्रेस या चित्रपटातीस गाणं स्वरबद्ध केलं. २०११ मध्ये त्यांना पद्भभूषण पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”