रिअॅलिटी शो बिग बॉसमधील स्पर्धक जान कुमार सानू सध्या चांगलाच चर्चेत आहे. (Photo: Instagram) जान कुमार सानूने मराठीचा अपमान केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. (Photo: Instagram) -
जान कुमार सानूने राहुल वैद्यशी भांडताना मराठी ऐकलं की आपल्याला चीड येते असं म्हटलं होतं. यामुळे मोठा वाद निर्माण झाला.
यानंतर मनसेकडून जान कुमार सानूचा विरोध करत धमकावण्यात आलं होतं. कलर्स टीव्ही तसंच जान कुमार सानूने माफी मागितली आहे. (Photo: Instagram) -
जान कुमार सानूने कार्यक्रमादरम्यान आपल्या कुटुंबाबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
जान कुमार सानूने आपले वडील कुमार सानू आणि आई रिटा भट्टाचार्य यांच्या नात्यासंबंधी एका गोष्टीचा खुलासा केला आहे. (Photo: Instagram) -
आई सहा महिन्यांची गर्भवती होती तेव्हाच आई आणि पप्पांचं नातं तुटलं होतं असं त्याने सांगितलं आहे.
आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर आपण आईसोबतच राहत होतो अशी माहिती त्याने दिली आहे. (Photo: Instagram) "माझ्या आईनेच आई आणि वडिलांची अशा दोन्ही भूमिका निभावल्या. माझ्या आईनेच माझा सांभाळ केला असून लहानाचं मोठं केलं. बिग बॉसमध्ये येण्याआधी माझ्या आईची काळजी कोणी घेईल याची चिंता होती," असं जान कुमार सानूने म्हटलं. (Photo: Instagram) आईची आठवण काढताना जान कुमार सानूने म्हटलं की, "प्रेमाची गोष्ट येते तेव्हा मी जुन्या विचारांचा आहे. प्रेम एकाच व्यक्तीवर होतं आणि आपण त्याच्यासोबतच कायम राहिलं पाहिजे यावर माझा विश्वास आहे". (Photo: Instagram) कुमार सानू यांनी रिटा भट्टाचार्यसोबत लग्न केलं होतं. १९९४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. (Photo: Instagram) -
यादरम्यान कुमार सानू यांचं अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्रीसोबत अफेअरच्या चर्चा होत्या. १९९३ मध्ये कुमार सानूच्या पत्नीनेच याचा खुलासा केला होता.
-
१९९४ मध्ये कुमार सानू यांनी सलोनी भट्टाचार्यसोबत लग्न केलं. कुमार सानू आणि सलोनी यांना दोन मुली आहेत.
-
दरम्यान जान कुमार सानूच्या वक्तव्याप्रकरणी कुमार सानू यांनीही माफी मागितली आहे.
“गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलंय. मुंबईबद्दल किंवा महाराष्ट्राबद्दल मी कुठलीच चुकीची गोष्ट माझ्या मनातसुद्धा आणू शकत नाही. पण माझ्या मुलाने खूप मोठी चूक केली आहे. त्याच्या आईने त्याला कशी शिकवण दिली माहित नाही, पण त्याच्या वडिलाच्या नात्याने मी सर्वांची हात जोडून माफी मागतो. गेले २७ वर्षे तो माझ्यासोबत राहत नाही”, असं ते म्हणाले आहेत. (Photo: Instagram)

PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?