-
-
रेहानाच्या ट्विटनंतर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झाली असून जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. तर भारताच्या अंतर्गत प्रश्नामध्ये हस्तक्षेप करु नये असं प्रत्युत्तर अनेक भारतीय सेलिब्रिटींकडून दिलं जात आहे. यामध्ये टीम इंडियाचे क्रिकेटपटूही आघाडीवर आहेत. माजी खेळाडू सचिन तेंडुलकरपासून प्रशिक्षक रवी शास्त्रीपर्यंत अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मानेही यावर भाष्य केलं होतं.
-
"जेव्हा आपण एकजुटीने उभे असतो तेव्हा देश कायमच मजबूत राहिला आहे. कठीण प्रसंगात समस्येचा तोडगा काढणे ही पहिली गरज आहे. भारताच्या विकासात शेतकऱ्यांची नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. मला खात्री आहे की, आपण एकजुटीने नक्कीच या प्रश्नावर तोडगा काढू", असं ट्विट रोहित शर्माने केलं होतं.
-
रोहित शर्माच्या या ट्विटवर रिप्लाय देताना अभिनेत्री कंगना रणौत चांगलीच संतापली आणि तिने सर्वच क्रिकेटपटूंना धारेवर धरलं.
-
“हे सर्व क्रिकेटपटू धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशा स्वरुपात का बोलत आहेत?” शेतकरी त्यांच्याच भल्यासाठी करण्यात आलेल्या कृषी कायद्यांना विरोध का करतील? असा सवाल कंगनाने विचारलाय. तसेच, "हे दहशतवादी आहेत, आणि गोंधळ घालत आहेत. असं म्हणा ना की, ते दहशतवादी आहेत, भीती वाटते का ? असं उत्तर कंगनाने रोहितच्या ट्विटवर केलं आहे. कंगनाच्या या ट्विटवर रोहित शर्मा रिप्लाय देतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बघुया अन्य क्रिकेटपटुंनी काय प्रतिक्रिया दिली होती…
-
गौतम गंभीर : बाहेरच्या शक्ती आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक दशकं त्यांनी आपल्यावर राज्य केलं. पण भारताने सगळ्यावर मात केली आणि पुढेही करेन. तुमची अब्जावधीची संपत्ती वापरा…सर्वश्रेष्ठ प्रयत्न करा तरी फरक पडणार नाही. कारण, हा नवीन भारत आहे.
-
अजिंक्य रहाणे : एकजूटीने कोणत्याही समस्येवर तोडगा निघतो. त्यामुळे एकजूटीने राहू आणि आपले अंतर्गत प्रश्न सोडवू.
-
अनिल कुंबळे : जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून, भारत आपले अंतर्गत प्रश्न शांतपणे सोडवण्यास सक्षम आहे.
-
रवी शास्त्री : शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या यंत्रणेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. शेतकरी कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो. हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे आणि मला खात्री आहे की चर्चेने तो प्रश्न आम्ही सोडवू.
-
शिखर धवन : “एका निष्कर्षापर्यंत पोहोचणं सध्या आपल्यासाठी खूपच आवश्यक आहे. उद्याच्या भविष्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र असायला हवं.
-
सुरेश रैना : देशात काही समस्या असतात. ज्या समस्यांची उत्तरे आज उद्या मिळू शकतात. परंतु याचा अर्थ असा होत नाही की बाहेरच्यांनी हस्तक्षेप करावा, अशा शब्दात रैनाने परदेशी सेलिब्रेटींना फटकारलं.
-
हार्दिक पांड्या : एकजूटीने राहू…
-
विराट कोहली : या कठीण प्रसंगी आपण एकजूटीने राहण्याची गरज आहे. शेतकरी आपल्या देशाचा महत्त्वपूर्ण घटक असून या समस्येवर लवकरच तोडगा निघेल. तोपर्यंत आपण शांतता राखणे गरजेचे आहे.
-
सचिन तेंडुलकर : भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक बनू शकतात, पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ते त्यांनीच ठरवावं. देश हा एकसंध राहिला पाहिजे, असे ट्विट सचिन तेंडुलकर याने केले आहे. एक राष्ट्र म्हणून एकजूटीने राहण्याची गरज आहे.
-
एकूणच, कंगनाने केलेल्या टीकेवर आता रोहित शर्मा किंवा टीम इंडियातील एखादा खेळाडू उत्तर देतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

“सनी देओल माझ्या आयुष्यातील सर्वात काळा अध्याय, देव सगळं बघतोय, न्याय होईल”