-
करोना प्रार्दुभावाचा मोठा फटका कलाविश्वाला बसला. जवळपास तीन-चार महिन्यांनंतर अटीशर्तींच्या आधारावर पुन्हा शूटिंग सुरू झाले. त्यामुळे आता बऱ्याच नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नवनवीन विषय, नवीन संकल्पना घेऊन करोना काळात खचलेल्या प्रेक्षकांना नवा आशय देण्यासाठी वाहिन्यांनी कंबर कसली आहे.
-
मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने मराठी सिनेसृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. श्रेयसने आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. छोट्या पडद्यावरुन आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या श्रेयसने बॉलिवूडच्या रुपेरी पड्यावरदेखील मोठं यश मिळवलं. मात्र आता एका मोठ्या ब्रेकनंतर श्रेयस तळपदे छोट्या पडद्यावर कमबॅक करतोय. झी मराठीवर लवकरच सुरु होणाऱ्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून श्रेयस तळपदे प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
-
झी मराठीवर नवी मालिका 'मन उडु उडु झालं' ३० ऑगस्टपासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ऋताने या मालिकेचा टिझर आणि प्रोमो शेअर करत चाहत्यानांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना 'कमिंग बॅक होम वाली फिलिंग' असं म्हंटल. पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर मालिका करताना हृताचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
-
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे 'बिग बॉस'. 'बिग बॉस मराठी'चं तिसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व १५ एप्रिल २०१८ रोजी पार पडलं. या पर्वामध्ये अभिनेत्री मेघा धाडे विजय ठरली. पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दुसरं पर्वही प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या पर्वामध्ये शिव ठाकरेने 'बिग बॉस मराठी २' ची ट्रॉफी जिंकली. हे दोन्ही पर्व प्रचंड गाजले. त्यामुळे आता प्रेक्षक तिसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
-
आजवर मालिकांमध्ये प्रेमाचा रंग गुलाबी असलेला आपण पाहिलाय. परंतु पहिल्यांदाच 'मन झालं बाजिंद' या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण आपल्याला पहायला मिळणार आहे. परंपरागत व्यवसायाला स्वतः कडील व्यवहार ज्ञानाने भरभराटीला नेणारा, माझं तुझं न करता प्रेमाची उधळण करणारा, त्याच्या कामाचा पसाराही मोठा आहे, असा आपला बाजिंदा नायक राया आहे. या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहेत.
-
सुपरस्टार अंकुश चौधरी तब्बल १५ वर्षांनंतर टेलिव्हिजनवर दमदार एण्ट्री घेण्यासाठी सज्ज झाला आहे. स्टार प्रवाहवर २१ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या 'मी होणार सुपरस्टार' या डान्स रिअलिटी शोमध्ये अंकुश सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातलं टॅलेण्ट या डान्सच्या मंचावर अवतरणार आहे. त्यामुळे सुपरस्टार होण्याचं कुणाचं स्वप्न पूर्ण होणार याची उत्सुकता नक्कीच असेल. या स्पर्धकांमधून सुपरस्टार निवडण्याची जबाबदारी अंकुशच्या खांद्यावर आहे.
-
झी मराठीवर लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' असं या मालिकेचं नाव असून त्यात अभिनेत्री अमृता पवार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ३० ऑगस्टपासून रात्री ९ वाजता 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' ही मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.
-
एक नवीन गूढ रहस्यमय मालिका १६ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, मालिकेचं नाव आहे 'ती परत आलीये'. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला. ज्येष्ठ अभिनेते विजय कदम या मालिकेत एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेत. विजय कदम हे बऱ्याच कालावधी नंतर टीव्हीवर पुनरागमन करणार आहेत.
-
सोनी मराठीवर 'वैदेही – शतजन्माचे आपुले नाते' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री सायली देवधर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”