-
करोना काळात अनेकजण आरोग्यप्रती जागरुक झाले आहेत. करोनामुळे अनेकांचे राहणीमान बदलले आहे.
वर्क फ्रॉम होम, तासनतास एकाच स्थितीत बसून काम करणे, खाणे-पिणे टाळणे यासारख्या अनेक गोष्टींमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढला आहे. -
विशेष म्हणजे ६५ टक्के तरुण हे वाढत्या वजनामुळे त्रस्त आहेत. यातील अनेक जण हे वजन कमी करण्यासाठी इंटरनेट आणि सोशल मीडियावर उपाय शोधत असतात.
-
तर काहीजण दिवसातील बरेच तास वजन कमी करण्यासाठी मेहनत करतात. पण यादरम्यान काही जण चुका करतात, ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी ते वाढू शकते.
-
पुरेसे अन्न न खाणे: आपल्यातील अनेक जण वजन कमी करण्यासाठी अन्न कमी करण्याऐवजी ते खाणं बंद करतात. पण ही तुमची सर्वात मोठी चूक ठरु शकते.
-
तुम्ही पुरेसे अन्न न खाल्ल्याने तुमच्या शरीराच्या काम करण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी ते वाढू शकते.
-
बऱ्याचदा काही आहारतज्ज्ञ वजन कमी करण्यासाठी आहारात काही विशिष्ट खाद्यपदार्थ न खाण्याचा सल्ला देतात. यामुळे अनेक जण वजन कमी करण्यासाठी चरबीयुक्त, प्रथिनेयुक्त पदार्थ खाणे टाळतात.
-
मात्र हे चुकीचे ठरते. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येकाच्या आहारात सर्व पोषक घटक असलेले अन्न काही प्रमाणात असणे आवश्यक आहे.
-
झोपेचा अभाव: वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत झोपेची भूमिका फार महत्त्वाची आहे. ज्या लोकांना दररोज 6 ते 8 तास झोप मिळत नाही, त्यांना वजन कमी करतेवेळी अडचणींचा सामना करावा लागतो.
-
जे लोक फार कमी झोपतात, त्यांचे मेटाबॉलिझम कमी होते. ज्यामुळे त्यांचे वजन कमी होत नाही.
-
शारीरिक निष्क्रियता: बराच वेळ एकाच स्थितीत बसणे आरोग्यासाठी खूप धोकादायक असू शकते. जेव्हा तुम्ही सतत न हलता काम करता, त्यावेळी शरीरात लिपेस नावाचे हार्मोन तयार होण्याची प्रक्रिया थांबते. यामुळे लोकांचे वजन वाढू शकते.

मी आंबेडकरी, ‘आरएसएस’च्या विजयादशमी सोहळ्याला उपस्थित राहणार नाही…, सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आई कमलताईंचे स्पष्टीकरण