-
डिजिटल युगात लोक ऑनलाइन पेमेंट पद्धती वापरून पैशांचा व्यवहार करत आहेत. दुकानातून एखादी छोटी वस्तू खरेदी करण्यापासून ते कोणत्याही मोठ्या कामाचे डिजिटल पेमेंट केले जात आहे.
-
मात्र असे असतानाही एटीएममधून पैसे काढून पैसे दिले जात आहेत, याचे कारण म्हणजे दुर्गम ठिकाणी डिजिटल पेमेंटचा वापर होत नाही किंवा सुरक्षेच्या कारणास्तव अनेक लोक त्याचा वापर करत नाहीत.
-
रोख रक्कम आवश्यक असेल तिथे एटीएम मशीनमधूनच पैसे काढले जातात. अनेकदा एटीएममधून पैसे काढताना खात्यातून पैसे कापले जातात. मात्र हातात पैसे मिळत नाहीत. अशा परिस्थितीत काय करावे याबद्दल जाणून घेऊयात.
-
बऱ्याचदा एटीएमधील तांत्रिक बिघाडामुळे तुमचे पैसे बाहेर येत नाहीत. एटीएममधील रोकड संपण्याचीही शक्यता असते. मात्र असं असलं तरी पैसे खात्यातून कापले जातात. या प्रकरणात, काही कालावधीनंतर पैसे आपोआप तुमच्या खात्यात जमा होतात आणि बँक तुम्हाला संदेशाद्वारे व्यवहाराबद्दल सूचित करते.
-
तुम्ही बँकेत न जाताही तुमच्या खात्यातील पैसे जाऊ शकतात. एटीएमच्या कार्ड रिडरमध्ये स्किमर बसवून अनेकदा फसवणूक केली जाते. चोरलेल्या डेटाचा वापर करून तुमचे कार्ड क्लोन करून असं केले जाऊ शकते आणि तुमच्या नकळत तुमच्या बँक खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात.
-
परस्पर पैसे काढले गेल्यास तुम्ही प्रथम बँकेच्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधावा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, खात्यातून कापलेली कोणतीही रक्कम तक्रार दाखल केल्यापासून सात कामकाजाच्या दिवसांच्या आत ग्राहकाच्या खात्यात परत केली जाणे आवश्यक आहे.
-
जर पैसे वेळेवर जमा केले नाही तर, त्यांना दररोज १०० रुपये दंड भरावा लागेल. पैसे परत मिळवण्यासाठी तुम्ही बँकेच्या शाखेत तक्रार करू शकता. त्यानंतर तुमच्या तक्रारीच्या नोंदीनुसार पैसे खात्यात पाठवले जातात.
-
तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तक्रार करू शकता आणि तुमच्या व्यवहारासंबंधी माहिती मिळवू शकता. खात्यातून गेलेले पैसे मिळवू शकता.
-
यापैकी कोणताही पर्याय काम करत नसल्यास तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा वित्तीय अधिकाऱ्यांना कळवू शकता. तक्रार लिखित स्वरूपात, पत्राद्वारे किंवा इंटरनेटद्वारे केली जाऊ शकते.
-
तुमचे पैसे परत मिळविण्यासाठी तुम्हाला तक्रार दाखल केल्यानंतर किमान ३० दिवस प्रतीक्षा करावी लागेल.

Ahmedabad Plane Crash: अपघाताच्या व्हिडीओत विमानाखाली दिसणाऱ्या राखाडी ठिपक्यात आहे दुर्घटनेचं कारण? हवाई उड्डाण तज्ज्ञांचा मोठा दावा!