-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो.
-
यासोबतच असे काही दुर्मिळ योग वर्षानुवर्षांनी तयार होतात, ज्याचा प्रभाव सर्व राशींवरही दिसून येतो. ज्योतिषशास्त्रात कोणताही योग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
-
१९ फेब्रुवारीपासून केदार, शंख, षष्ठ, ज्येष्ठ आणि सर्वार्थ सिद्धयोग मिळून ‘पंचमहायोग’ तयार झाला आहे. हा पंचयोग सुमारे ७०० वर्षांनंतर तयार झाला आहे.
-
यामुळे तीन राशीच्या लोकांसाठी धन आणि प्रगतीचे योग बनले आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
-
पंच महायोग तयार झाल्याने मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण या काळात तुमच्या संक्रमण कुंडलीत हंस आणि मालव्य असे दोन राजयोग तयार होत आहेत. त्यामुळे यावेळी तुमचे रखडलेले काम पूर्ण होऊ शकतात. तसेच जे बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.
-
दुसरीकडे नौकरी करणाऱ्या लोकांची पदोन्नती हेण्याची शक्यता निर्माण होत आहे. यासोबतच कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमची प्रतिष्ठाही वाढेल. दुसरीकडे, हा काळ व्यावसायिकांसाठी अनुकूल ठरू शकतो. व्यवसाय करार निश्चित केला जाऊ शकतो, ज्यामध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे.
-
पंच महायोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. तसेच, जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत किंवा परदेशात जाऊ इच्छितात, त्यांच्यासाठी हा कालावधी अनुकूल असेल.
-
दुसरीकडे, यावेळी व्यावसायिकांना चांगली ऑर्डर मिळून नफा होऊ शकतो. तसेच यावेळी तुम्हाला कोर्ट-कचेरी प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. नोकरदारांना वेतनवाढ आणि त्यांची पदोन्नती होण्याची शक्यता आहे. १७ जानेवारीपासून तुम्हाला शनीच्या साडेसातीपासून मुक्तता मिळाली आहे. म्हणून तुमच्यावर शनिदेवाची विशेष कृपा राहील.
-
पंच महायोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतात. यावेळी तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. यासोबतच तुमच्या संक्रमण कुंडलीच्या लग्न घरामध्ये शश नावाचा राजयोग तयार होत आहे. म्हणून, जर तुम्ही कोणतीही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ अनुकूल ठरु शकते.
-
तसेच, यावेळी तुमचे तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध तयार होऊ शकतात. व्यवसायात भागीदारी होऊ शकते, ज्यामध्ये नफा होऊ शकतो. दुसरीकडे, जर तुम्हाला या काळात नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरु शकतो.
-
(वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल