-
घर… प्रत्येक माणसाचं एक स्वप्न!
आपलं स्वतःचं छोटंसं का होईना पण एक घर असावं, ही प्रत्येकाच्या मनाची आतून उठणारी आर्त इच्छा असते. या एका स्वप्नासाठी माणूस दिवसरात्र मेहनत करतो, छोट्या छोट्या गोष्टींसाठी बचत करतो आणि कष्टाचं घर बांधतो. (फोटो: अनस्प्लॅश) -
पण कधी कधी नवीन घरात पाऊल ठेवताच अडचणींना सुरुवात होते. इतकं स्वप्नवत घर असूनही त्रास का होतोय हेच समजेनासं होतं… (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
आचार्य चाणक्य आपल्या नीतिशास्त्रात सांगतात. पाच ठिकाणी चुकूनही घर बांधू नये. अशा जागा दुःख, संकट आणि अशांतीने भरलेल्या असतात, जणू काही नरकाचाच अनुभव देणाऱ्या. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
१. चाणक्य नीती सांगते — जिथे भीतीचं वातावरण असतं, अशा ठिकाणी घर बांधणं टाळा. अशा जागा केवळ संकटांना आमंत्रण देतात. (फोटो: अनस्प्लॅश)
-
२. जिथे ना समाजाची भीती ना कायद्याचा धाक, तिथे घर बांधणं धोकादायक ठरू शकतं. अशा ठिकाणी तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेला कायमचा धोका असतो. चाणक्य नीती सांगते, जिथे लज्जा आणि मर्यादा राहिलेल्या नाहीत तिथे घर बांधणं टाळा. अशा ठिकाणी मान-सन्मान कधीच मिळत नाही. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
३. चाणक्य नीती सांगते जिथे लज्जा आणि मर्यादा राहिलेल्या नाहीत, तिथे घर बांधणं टाळा. अशा ठिकाणी मान-सन्मान कधीच मिळत नाही. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
४. चाणक्य म्हणतात, जिथे दान, त्याग आणि सहृदयता नाही, अशा ठिकाणी घर काय भाड्यानेही राहू नये! अशी जागा नात्यांपेक्षा स्वार्थाने भरलेली असते. (फोटो: अनस्प्लॅश)
-
५. जिथे उपजीविकेचा मार्गच नाही, तिथे स्थायिक होणं म्हणजे संकटाला आमंत्रण! चाणक्य म्हणतात, अशा ठिकाणी घर बांधणं तर सोडाच थांबणंही धोकादायक ठरू शकतं. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
घर बांधताना केवळ सुंदर जागा नाही, तर उपजीविकेचा आधारही महत्त्वाचा असतो. जिथे कमाईचं साधन नाही तिथे जीवन टिकूच शकत नाही, म्हणूनच घरासाठी जागा निवडताना उत्पन्नाचे स्रोत नक्की लक्षात ठेवा. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
६. शास्त्रानुसार वर्षानुवर्षे ओसाड पडलेल्या जागांपासून दूर राहा. अशा ठिकाणी वाईट ऊर्जा दडलेली असते, जी घरात कलह, अस्वस्थता आणि मानसिक त्रास निर्माण करू शकते. घर बांधण्यापूर्वी त्या जागेचा इतिहास जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. (छायाचित्र: अनस्प्लॅश)

Maruti Chitampalli : “जंगलात मेकअप करून, सेंट लावून जायचे नाही”, मारुती चितमपल्ली यांचा सल्ला