-
तेलंगणातील मेडीगड्डा धरणामुळे सिरोंचा तालुक्यातील ५४ गावांना महापुराचा फटका बसला आहे.(फोटो- रवींद्र जुनारकर)
-
सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली गाव पुरामुळे पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे.
-
गावातील २०६ कुटुंबे महामार्गावरील जंगलात ताडपत्रीच्या साह्याने तंबू उभारून तेथे वास्तव्याला आहे.
-
आता आम्ही गावात परत जाणार नाही, आम्हाला इतरत्र हलवा, आमचे पुनर्वसन करा, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
-
तर, ग्रामस्थांच्या या भूमिकेमुळे जिल्हा प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. साप, विंचू, किड्यांचे वास्तव्य असलेल्या जंगलात १० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून हे ग्रामस्थ वास्तव्याला आहे
-
हा प्रकल्प महाराष्ट्राच्या सहकार्याने पूर्ण झाला, त्याची किंमत मात्र सीमेवरील ग्रामस्थांना मोजावी लागत आहे.
-
सिरोंचा तालुक्यातील नागरिकांनी या प्रकल्पाला निर्मितीवेळीच प्रखर विरोध केला होता.
-
ग्रामस्थांनी धरणाच्या निर्मितीवेळी जी भीती व्यक्त केली होती, ती आता खरी ठरतेय.
-
पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून गावकरी अस्वस्थ आहेत.
-
यंदा आलेल्या पुरात सिरोंचा तालुक्यातील सीमेवरील ५४ गावे पाण्याखाली गेली आहेत.

PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?