-    इंडोनेशियात फुटबॉल सामन्यादरम्यान घडलेल्या हिंसाचारात तब्बल १७४ जणांनी जीव गमावला आहे. या दूर्घटनेत १८० हून जास्त लोक जखमी झाले आहेत. (फोटो सौजन्य-रॉयटर्स) 
-    ‘अरेमा एफसी’ आणि ‘पर्सेबाया सुराबाय’ या संघांच्या सामन्यादरम्यान ही भीषण घटना घडली आहे. पर्सेबाया सुराबायकडून पराभव झाल्यानंतर अरेमा एफसी संघाच्या चाहत्यांनी मैदानावर गोंधळ घातला. या घटनेत शेकडो लोकांचा मृत्यू झाला. 
-    इंडोनेशियातील पूर्व जावा भागात ही घटना घडली आहे. नाराज चाहत्यांना हुसकवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या कांड्यांचा मारा केला. त्यामुळे मैदानावर चेंगराचेंगरी झाली. 
-    इंडोनेशियात पुढील वर्षी मे आणि जूनमध्ये फिफाच्या २० वर्षांखालील खेळाडूंच्या विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यापूर्वी घडलेल्या या घटनेनं खेळाडूंच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. 
-    चेंगराचेंगरीत बेशुद्ध झालेल्या चाहत्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
-    या घटनेनंतर इंडोनेशिया बीआरआई लीगचे सर्व सामने एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहेत. 
-    पराभवामुळे निराश झालेल्या चाहत्यांनी वाहनांची तोडफोड करत जाळपोळ केली. 
-    ‘फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडोनेशिया’कडून या हिंसाचाराची चौकशी करण्यात येणार आहे. 
-    पोलिसांनी सामन्यांदरम्यान बंदुक किंवा अश्रू धुराचा वापर करू नये, असे फिफाच्या सुरक्षा नियमांमध्ये नमुद आहे. मात्र, तरीही चाहत्यांवर अश्रू धुराचा वापर करण्यात आल्याचे पुढे आले आहे. 
-    चाहत्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात गोलपोस्टचे नुकसान झाले. 
-    मैदानावरील हिंसाचारानंतर स्टेडियममध्ये असे विदारक दृश्य होते. 
-    (फोटो सौजन्य-रॉयटर्स) 
 
  बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो… 
   
  
  
  
  
  
  
  
  
  
  
   
   
   
   
   
  