-
ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात झालेल्या राड्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.
-
त्यानंतर न्यायालयाकडून आव्हाड आणि कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यात ७२ तासांमध्येच जितेंद्र आव्हाडांवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने आव्हांडाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
-
त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तसेच, आपली भूमिका मांडली आहे.
-
जितेंद्र आव्हाड म्हणाले, ३०७, ३२३, ३२३ हे सगळे गुन्हे मला मान्य हे माझ्याहातून घडले आहेत आणि घडू शकतात.
-
पण, ३५४ सारखा विनयभंगाचा गुन्हा अमान्य असून, जो मी आयुष्यात कधी केला नाही. पोलिसांनी हा गुन्हा कसा काय नोंद केला.
-
समाजात माझी मान खाली जाईन, अशा पद्धतीचा गुन्हा नोंदवायचा हा षडयंत्राचाच भाग असू शकतो. त्यामुळे राजकारण करावं आम्हीही केलं, पण आमदार आणि पक्षांमध्ये भेदभाव नाही केला.
-
‘हर हर महादेव’ प्रकरणी झालेल्या गुन्हाचं मला काही बोलायचं नाही. इतक्या खालचं राजकारण सुरु आहे. त्यापेक्षा यात न राहिलेलं बरं. मला त्या कलमाबद्दल वाईट वाटलं. माझ्या खुनाचा कट रचला असता, काही वाटलं नसते.
-
३५४ कलम मनाला लागलं. ३५४ आणि ३७६ साठी मी जन्माला आलो नाही.
-
राजकारणात आक्रमकपणा नवा नाही. खालच्या पातळीवरील राजकारण महाराष्ट्रात होऊ नये. घरे उद्ध्वस्त होतील, असेही आव्हाड यांनी म्हटलं.

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल