-
प्रहार संघटनेचे अध्यक्ष व अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया आल्या.
-
बच्चू कडू यांचा अपघात नाही, तर घातपात झाल्याचाही आरोप झाला.
-
तसेच बच्चू कडू यांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही झाली.
-
यावर आता स्वतः बच्चू कडू यांनीच अपघातानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आणि आपली भूमिका स्पष्ट केली.
-
ते सोमवारी (२३ जानेवारी) अमरावतीत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
-
बच्चू कडू अपघातानंतर पहिली प्रतिक्रिया देताना नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
माझी प्रतिक्रिया न घेता ज्या प्रतिक्रिया आल्या त्या फार चुकीच्या आहेत – बच्चू कडू
-
हा अपघातच आहे, घातपात कोणीही केलेला नाही – बच्चू कडू
-
या अपघातात वाहनचालकाची चूक नाही – बच्चू कडू
-
मी वाहनचालकाला पाहिलंच नव्हतं, मी माझ्याच गोंधळलेल्या अवस्थेत होतो – बच्चू कडू
-
गाडी वेगाने होती आणि मी इकडे जाऊ की तिकडे जाऊ अशा गोंधळात होतो – बच्चू कडू
-
माझी गाडी बाजूला लावलेली होती आणि तेथे कमी जागा होती – बच्चू कडू
-
त्यामुळे मी थोडासा वळालो आणि माझ्या गोंधळामुळे तो वाहनचालक मला धडकला – बच्चू कडू
-
हा अपघात माझ्या गोंधळामुळे झाला आहे – बच्चू कडू
-
माझ्या अपघातात वाहनचालकाचा काहीही दोष नाही आणि घातपाताचा तर दूरदूरपर्यंत काहीच संबंध नाही – बच्चू कडू
-
कुठल्याही गोष्टीवर शाहनिशा करून राजकारण करावं. पडताळणी करून राजकारण करावं – बच्चू कडू
-
किमान ज्याचा अपघात झाला त्याची प्रतिक्रिया घेऊन तरी राजकारण करावं – बच्चू कडू
-
चुकीचा पायंडा पडू नये असं मला वाटतं – बच्चू कडू (सर्व छायाचित्र – संग्रहित)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”