-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या बंडखोर अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला.
-
शरद पवारांनी कोणत्याही नेत्याचा थेट उल्लेख न करता कुणीतरी असं म्हणत अप्रत्यक्षपणे टीका केली.
-
ते गुरुवारी (१७ ऑगस्ट) बीडमधील स्वाभिमान सभेत बोलत होते. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
बीडमधील नेत्यांना काय झालं मला माहिती नाही – शरद पवार
-
एक कुणीतरी आमचा सहकारी पक्ष सोडून केला असं एका नेत्याने सांगितलं. कालपर्यंत ठीक होता, काय झालं म्हणून चौकशी केली – शरद पवार
-
तेव्हा समजलं की, त्यांनी कुणीतरी सांगितलं की, शरद पवारांचं वय झालं आहे – शरद पवार
-
त्यामुळे आपल्याला भवितव्याचा विचार करायचा असेल, तर दुसरा नेता निवडला पाहिजे असं बोललं गेलं – शरद पवार
-
मला एवढंच सांगायचं आहे की, माझं वय झालं म्हणता, तुम्ही माझं काय बघितलं आहे – शरद पवार
-
त्यामुळे तुम्हाला सामुदायिक शक्ती उभी केल्यावर काय होतं हे या जिल्ह्यातील जनतेच्या पाठिंब्यावर आम्ही एकदा दाखवून दिलं आहे – शरद पवार
-
इथल्या तरुण पीढीच्या मदतीने अनेकांचे पराभव इथं झाले आहेत – शरद पवार
-
माझं एकच सांगणं आहे की, सत्तेच्या बाजूला तुम्हाला जायचं असेल, तर जा, पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतलं असेल, बरं झालं असेल त्यांच्याबद्दल थोडी माणूसकी तरी ठेवायचा प्रयत्न करा – शरद पवार
-
हे नाही केलं, तर लोक त्यांना योग्य प्रकारचा धडा देतील – शरद पवार
-
माझी तक्रार ही आहे, की मागील निवडणुकीत त्यांनी जनतेची मदत घेतली. लोकांनी निवडून दिलं आणि भाजपाचा पराभव केला – शरद पवार
-
भाजपाचा पराभव करून ते सत्तेत आले आणि आज त्यांनी भाजपाच्या दावणीला जाऊन बसायची भूमिका घेतली – शरद पवार
-
ते आज हे करत आहेत, पण उद्या जेव्हा लोकांना मतदान करण्याची संधी मिळेल त्यावेळी कोणतं बटन दाबायचं आणि त्यांना कुठं पाठवायचं हा निर्णय या जिल्ह्यातील प्रत्येक मतदार घेतल्याशिवाय राहणार नाही – शरद पवार (सर्व संग्रहित छायाचित्र)

Ajit Pawar : पोलीस उपअधीक्षकाची आंदोलकाला फिल्मी स्टाईलने लाथ; जालन्यातील घटनेवर अजित पवार म्हणाले…