-
तमिळनाडूतील चेन्नई आणि जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये मिचौंग या चक्रीवादळामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत केले आहे.
-
या चक्रिवादळाचे परिणाम पाहता २०१५ च्या महापुराची पुनरावृत्ती होण्याची भीती निर्माण झाली आहे.
-
चक्रीवादळ ‘मिचौंग’ दक्षिण आंध्र प्रदेश जवळ आल्याने IMD ने आंध्र प्रदेश आणि उत्तर तमिळनाडू-पुडुचेरी किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (पीटीआय फोटो)
-
अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती (पीटीआय फोटो)
-
रेल्वे आणि उड्डाणे रद्द झाल्याने वाहतूक सेवांवर गंभीर परिणाम झाला. (पीटीआय फोटो)
-
गेल्या २४ तासांत चेन्नईतील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. (पीटीआय फोटो)
-
चेन्नई आणि जवळपासच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. (पीटीआय फोटो)
-
हवामान खात्याने प्रभावित जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे. (पीटीआय फोटो)
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना मदतीचे आश्वासन दिले आहे (पीटीआय फोटो)
-
चक्रीवादळामुळे तामिळनाडू सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. (पीटीआय फोटो)
-
चक्रीवादळाचे परिणाम पाहता तमिळनाडू सरकारने चेन्नईतील खाजगी कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना 5 डिसेंबरपर्यंत घरून काम करण्याची परवानगी देण्याचे आवाहन केले आहे. (पीटीआय फोटो)
-
पुरग्रस्त भागात बचावकार्यासाठी एनडीआरएफचे २५० जवान तैनात करण्यात आले आहेत. (पीटीआय फोटो)
-
चेन्नई विमानतळावर पाणी साचल्यामुळे सकाळी ९.४० ते रात्री ११ वाजेपर्यंत कामकाज बंद ठेवण्यात आले होते. (पीटीआय फोटो)
-
भुयारी मार्गात पाणी साचले असून, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत . (पीटीआय फोटो)
-
पूरग्रस्त भागात वन्यजीव विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. . (पीटीआय फोटो)

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”