-
नुकतंच लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं आहे. त्यानंतर देशभरामध्ये एक्झिट पोल म्हणजेच अंदाज वर्तवले जात आहेत. विविध संस्थांकडून हे अंदाज वर्तवण्यात येत आहेत.
-
या सर्व अंदाजामध्ये भाजपाच्या एनडीए आघाडीला पुन्हा एकदा संधी मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
-
दरम्यान, २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचे अंदाज काय होते आणि निकाल काय लागला होता? हे या निमित्ताने चर्चेत आले आहे.
-
कारण, २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अंदाजामध्ये भाजपाला बहुमत मिळत असल्याचं वर्तवण्यात आलं होतं.
-
परंतु जेव्हा निकाल घोषित झाले त्यावेळेला काँग्रेसला आणि त्या वेळच्या यूपीएला जास्त जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसचं सरकार देशामध्ये स्थापन झालं होतं.
-
त्यामुळे याही निकालाची स्थिती नेमकी काय असेल? जे अंदाज वर्तवण्यात आले आहे ते खरे ठरणार का? निकाल आणि अंदाज सारखेच असतील की वेगळे? हे आपल्याला निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.
-
काय होते २००४ च्या लोकसभा निवडणुकीचे अंदाज?
-
२००४ साली लोकसभा निवडणुकीच्या अंदाजांमध्ये आजतक या संस्थेने एनडीएला २४८ जागा यूपीएला १९० आणि इतर १०५ जागांचा अंदाज दाखवला होता.
-
२००४ साली लोकसभा निवडणुकीच्या अंदाजांमध्ये एनडीटिव्ही या संस्थेने एनडीएला २३० ते २५० जागा तर यूपीएला १९० ते २०५ आणि इतर १०० ते १२० जागा दाखवल्या होत्या.
-
तर २००४ साली लोकसभा निवडणुकीच्या अंदाजांमध्ये सी-वोटर या संस्थेने भाजपाला २६३ ते २७५ जागा काँग्रेसला १७४ ते १८६ आणि इतर ८६ ते ९८ जागा दाखवल्या होत्या.
-
प्रत्यक्षपणे निकाल आल्यानंतर मात्र, एनडीएला १८१ जागा मिळाल्या आणि यूपीएला मिळाल्या होत्या २०८ जागा तर अन्य पक्षांच्या खात्यात गेल्या होत्या १५४ जागा.
-
त्यानंतर देशामध्ये यूपीए आणि अन्य यांनी मिळून सत्ता स्थापन केली. त्यावेळी पंतप्रधान पदावर डॉ. मनमोहन सिंग यांना संधी मिळाली.
-
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित) हे देखील पहा- कोणी मतदानासाठी चक्क घोड्यावरून पोहचलं तर जवानांनी, खेळाडूंनी आणि पुढाऱ्यांनी लावल्या रांगा; फोटो पाहून व्हाल थक्क

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल