-
रश्मी ठाकरे यांची दैनिक सामनाच्या संपादकपदी निवड करण्यात आली आहे. नेहमीच आपल्या कुटुंबाला खंबीर साथ देणाऱ्या रश्मी ठाकरे ही नवी जबाबदारीही तितक्याच यशस्वीपणे सांभाळतील. ( सर्व फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो’, असं अनेक वेळा म्हटलं जातं. तसंच काहीसं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
-
पत्नी रश्मी ठाकरे यांनी प्रत्येक पावलावर उद्धव ठाकरे यांना साथ दिली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या राजकीय प्रवासात रश्मी ठाकरे कायम खंबीरपणे त्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या.
-
रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं लग्न नेमकं कसं झालं किंवा त्यांची पहिली भेट कशी झाली हे फार कमी जणांना माहित आहे.
-
रश्मी ठाकरे १९८७ साली एलआयसीमध्ये नोकरीवर रुजू झाल्या. कंत्राटी स्वरुपाची ही नोकरी होती.
-
एलआयसीमध्ये नोकरी करत असताना त्यांची जयवंती ठाकरे यांच्याबरोबर मैत्री झाली. जयवंती या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहिण आहे.
-
जयवंती यांनी रश्मी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणली. उद्धव ठाकरे त्यावेळी राजकारणात फारसे सक्रीय नव्हते. ते फोटोग्राफी करायचे.
-
उद्धव ठाकरे यांनी एक अॅड एजन्सी सुद्धा सुरु केली होती. या ओळखीचे रुपांतर पुढे मैत्रीत झाले. नंतर १३ डिसेंबर १९८९ रोजी दोघे विवाहबद्ध झाले.
-
रश्मी ठाकरे यांचा राजकीय निर्णयांमध्ये किती सहभाग आहे हे ठाऊक नाही. पण शिवसेनेच्या कठीण काळात त्यांनी पक्षाला बांधून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
-
आजही शिवसेनेच्या सर्व कार्यक्रमांमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचा वावर असतो.
-
“रश्मी ठाकरे या मूळात शांत स्वभावाच्या आहेत. त्या मितभाषी असल्या तरी निश्चयी आहेत. त्या स्वत:ला नेहमी कामामध्ये गुंतवून ठेवतात” अशी माहिती त्यांचे काका दिलीप श्रृंगारपुरे यांनी दिली होती.
-
रश्मी ठाकरे यांचा जन्म डोंबिवलीत एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. लग्नाआधीचे त्यांचे आडनाव पाटणकर आहे.
-
८० च्या दशकात मुलुंडच्या वझे-केळकर कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली. त्यांचे वडिल माधव पाटणकर यांचा कौटुंबिक व्यवसाय आहे.
-
रश्मी ठाकरे यांच्यावर त्यांचे आई-वडिल आणि सासू-सासऱ्यांचा प्रभाव आहे. “रश्मी यांचे आई-वडिल आणि सासू-सासऱ्यांबरोबर दृढ नाते आहे.
-
"कौटुंबिक संस्कारांमध्ये मुले घडतात यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच सत्ता आणि लोकप्रियतेची हवा कधी त्यांच्या डोक्यात गेली नाही” असे रश्मी ठाकरे यांचे काका श्रृंगारपुरे यांनी सांगितले.

शनी महाराज निघाले चांदीच्या पावलांनी; ‘या’ राशींमध्ये होणार उलाढाली! वर्षभर शनिदेव देणार पैसाच पैसा, मिळू शकते मोठं सरप्राईज